शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

रेल्वे अपघातांमागील कटाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले, "प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 1:58 PM

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात दरवर्षी १७१ अपघात होत होते.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानातील अजमेर येथे रेल्वे अपघात घडवण्याचा मोठा कट रचण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रुळावर सिमेंटचा मोठा दगड ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. वारंवार समोर येणाऱ्या या घटनांनंतर आता भारतीय रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे.

याबाबत आता रेल्वेमंत्र्यांनीही इशारा दिला आहे. न्यूज १८ इंडियाच्या एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाष्य केलं. यावेळी, ते म्हणाले की, मी त्यांना (कट रचणाऱ्यांना)  स्पष्टपणे चेतावणी देतो. असे करणाऱ्या प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू. कोणत्याही परिस्थितीत दररोज प्रवास करणाऱ्या देशातील दोन कोटी प्रवाशांचे आम्ही जबाबदारीने संरक्षण करू. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणालाही खेळू देणार नाही. असा प्रत्येक प्रयत्न आपण हाणून पाडू शकतो, त्यामुळं आपण सतर्क राहायला हवे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी देशात दरवर्षी १७१ अपघात होत होते. मात्र, सध्याच्या घडीला ४० अपघात झाले आहेत. पण तरीही रात्रंदिवस मेहनत करून स्ट्रक्चर बदलण्यावर इतका भर दिला आहे की, ती ४० ची संख्याही आणखी कमी होईल. आगामी काळात आम्ही अधिक जबाबदारीनं काम करू आणि प्रवाशांची सुरक्षा आणखी सुनिश्चित करणार आहोत.

याचबरोबर, छठच्या दिवशी घरी जाणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या समस्यांबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, जितक्या ट्रेन चालवल्या जातात, त्या सर्व भरलेल्या असतात. रेल्वेची क्षमता वाढवली जाईल. भारताने एका वर्षात स्वित्झर्लंडइतके रेल्वे ट्रॅक जोडले. दरवर्षी सात हजार डबे बनवले जात आहेत. क्षमता वाढवण्यावर जास्त भर आहे. पुढील १० वर्ष लक्ष केंद्रित असून रेल्वेचा संपूर्ण कायापालट होईल.

टॅग्स :railwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव