शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Indian Railway : भारतीय रेल्वेने धावत्या गाड्यांमधून 'ही' सुविधा हटविली, जाणून घ्या काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 19:07 IST

Indian Railway : ही सुविधा प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली होती, परंतु जास्त खर्च आणि तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसध्या भारतीय रेल्वे देशभरातील 6000 हून अधिक स्टेशनवर वाय-फाय इंटरनेट सुविधा पुरवत आहे. रेल्वे स्टेशनवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली :  धावत्या गाड्यांमध्ये भविष्यात भारतीय रेल्वेद्वारे (Indian Railway) उपलब्ध करून देण्यात येणारी वाय-फाय (Wi-Fi) सुविधा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाय-फायवरून चित्रपट किंवा मनोरंजनाचा आनंद घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांसाठी हा एकप्रकारे धक्का आहे. रेल्वे मंत्रालय (ministry of railways) सध्या धावत्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा पुरवणार नाही. ही माहिती सरकारने संसदेत दिली आहे. ही सुविधा प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली होती, परंतु जास्त खर्च आणि तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा बंद करण्यात आली आहे. (railways removed wi-fi internet facility from moving trains government gave information)

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात सांगितले की, मंत्रालयाने जवळपास दोन वर्षांपूर्वी सेटेलाइट कंप्‍यूनिकेशन टेक्नालॉजीद्वारे धावत्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा देण्याची योजना आखली होती. वाय-फाय आधारित इंटरनेट सुविधा हावडा राजधानी एक्सप्रेसमध्ये एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली.

या दरम्यान ही टेक्नालॉजी अधिक महाग असल्याचे दिसून आले. त्यासाठी इंटेंसिव्ह कॅपिटलसह रेकरिंग कास्टची आवश्यकता असते. जसे की बँडविड्थ शुल्क हा प्रकल्पाला कॉस्ट इफेक्टिव्ह करत नाहीत. सध्या, धावत्या गाड्यांमध्ये वाय-फाय इंटरनेट सेवांसाठी कोणतेही योग्य आणि किफायतशीर टेक्नॉलॉजी नाही. त्यामुळे ही सुविधा तूर्तास वगळण्यात आली आहे.

6000 हून अधिक स्टेशनवर वाय-फाय इंटरनेट सेवा सुरूसध्या भारतीय रेल्वे देशभरातील 6000 हून अधिक स्टेशनवर वाय-फाय इंटरनेट सुविधा पुरवत आहे. या 6000 स्टेशनांपैकी आंध्र प्रदेशात 509, महाराष्ट्रात 550, बिहारमध्ये 384, अरुणाचल प्रदेशात 3, आसाममध्ये 222, उत्तर प्रदेशात 762, पश्चिम बंगालमध्ये 498, तामिळनाडूमध्ये 418, मध्य प्रदेशात 393, गुजरातमध्ये 320, ओडिशा 232, राजस्थान 458, कर्नाटक 335, गुजरात 320, झारखंड 217, पंजाब 146, हरियाणा 134, केरळ 120, छत्तीसगड 115, तेलंगणा 45, दिल्ली 27, हिमाचल प्रदेश 24, उत्तराखंड 24, जम्मू आणि काश्मीर 14, गोवा 20, त्रिपुरा 19, चंदीगड 5, नागालँड 3, मेघालय, मिझोराम आणि सिक्कीम 1-1 रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.

रेल्वे स्टेशनवर सुरक्षाा व्यवस्थारेल्वे स्टेशनवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. महिला प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी, निर्भया निधी अंतर्गत 983 स्थानकांवर इंटिग्रेटेड इंक्लायरी रिस्पांस मॅनेजमेंट सिस्टिमची (IERMS) व्यवस्था सामील आहे. आतापर्यंत एकूण 814 स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेWiFiवायफायbusinessव्यवसायInternetइंटरनेट