शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

मध्य प्रदेशात पावसाचे ११ बळी

By admin | Published: July 10, 2016 2:32 AM

मध्य प्रदेशला संततधार पावसाने झोडपून काढले असून, आतापर्यंत ११ लोक मृत्युमुखी पडले आहेत. सतना जिल्ह्यात लष्कराने सुमारे ४00 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशला संततधार पावसाने झोडपून काढले असून, आतापर्यंत ११ लोक मृत्युमुखी पडले आहेत. सतना जिल्ह्यात लष्कराने सुमारे ४00 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की, गेल्या तीन ते चार दिवसांत आठ लोक मृत्युमुखी पडले आहेत. भोपाळमध्ये दोन जण मरण पावले आहेत. याशिवाय टिकमगड, रेवा, झाबुआ, बेतूल, रायसेन आणि पन्ना येथे प्रत्येकी एक जण मरण पावला आहे. शाहपूर तलावाजवळ शनिवारी दुपारी एक जण वाहून गेला. तत्पूर्वी, मांडला आणि सिंगरौली जिल्ह्यांत प्रत्येकी एक जण मरण पावला होता. चौहान यांनी सांगितले की, नर्मदा नदी होशंगाबाद येथे धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे. मदतीसाठी १0७९ हा दूरध्वनी क्रमांक सरकारने कार्यरत केला आहे. रविवारची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात जाऊन मदत व बचाव कार्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)400 लोकांना रघुराज तालुक्यात लष्कराने सुरक्षित स्थळी हलविले. सतना जिल्ह्यात तमस, सोनी व मंदाकिनी या नद्यांना महापूर आला आहे. पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणी ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सागर, जबलपूर, होशंगाबाद, भोपाळ, इंदौर, उज्जैन आणि ग्वाल्हेर या ठिकाणांना पावसाचा धोका आहे. १ जूनपासून राज्यातील २५ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १६ जिल्ह्यांत सरासरीएवढा, तर ९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. केवळ एका जिल्ह्यात पावसाची तूट आहे.