शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

देवभूमीत पावसाचे तांडव; तीन दिवसांमध्ये ७४ बळी, हिमाचलमध्ये १०,००० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 06:11 IST

शिमल्याच्या समर हिल परिसरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बचाव कार्य सुरू आहे.

शिमला :हिमाचल प्रदेशात आतापर्यंत सरासरीच्या दीडपट पाऊस झाला असून, मंडी, शिमला, हमीरपूर, कांगडा आणि बिलासपूर जिल्ह्यांत जास्त विध्वंस झाला आहे. या पावसामुळे सुमारे १०,००० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, तीन दिवसांत ७४ जणांचा मृत्यू झाला असून, २ हजारांहून जास्त जणांना वाचवण्यात आले. तर पावसाळा सुरू झाल्यापासून २१७ जणांनी प्राण गमाविले आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे ६,६०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. 

मंडी जिल्ह्यात सामान्यपेक्षा ३१७ टक्के, बिलासपूरमध्ये २२५ टक्के आणि शिमलामध्ये १९१ टक्के अधिक पाऊस झाला. ८००हून अधिक रस्ते, ११३५ विद्युत ट्रान्स्फॉर्मर आणि २८५ पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प झाल्या आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे १८०० हून अधिक मार्गावरील बससेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे. ११ ते १७ ऑगस्टदरम्यान राज्यात सामान्यत: ६४ मिमी पाऊस पडतो. मात्र, यावेळी १३५.१ मिमी पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. (वृत्तसंस्था)

१४ मृतदेह सापडले; ७ अजूनही बेपत्ता

शिमल्याच्या समर हिल परिसरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बचाव कार्य सुरू आहे. येथे १४ ऑगस्ट रोजी शिवमंदिरावर दरड कोसळली होती. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले, तर ७ अजूनही बेपत्ता आहेत.

उत्तराखंडमध्ये शेकडो संसार उघड्यावर

उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे की, या हंगामात राज्याचे आतापर्यंत ६५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सततच्या भूस्खलनामुळे लोक घरसामान बांधून सुरक्षित ठिकाणी जायला निघाले आहेत.

महाराष्ट्रासह या राज्यांना अजून प्रतीक्षाच

पुढील दाेन दिवसांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे. छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाबच्या आठ जिल्ह्यांमध्ये पूर

अमृतसर : मुसळधार पावसामुळे पंजाबमधील आठ जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. भाक्रा धरणाचे दरवाजे उघडल्याने सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रोपर, होशियारपूर, गुरुदासपूर, कपूरथला, अमृतसर, तरनतारन आणि फिरोजपूरला पुराच्या पाण्याने वेढले आहे. गुरुदासपूरच्या श्री हरगोबिंदपुरा येथे पावसाच्या नाल्याचे पाणी पाहण्यासाठी गेलेली दोन मुले वाहून गेली. होशियारपूरमधील अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत.

 

 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश