शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"दिल्लीत गोळीबार सर्रास, दहशतीचे वातावरण...", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:51 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही सिंगला स्वीट्ससमोर उभे आहोत, हे खूप व्यस्त मार्केट आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. रविवारी अरविंद केजरीवाल दिल्लीतील टिळक नगर येथील कार शोरूममध्ये गेले होते. याठिकाणी जून महिन्यात खंडणीसाठी गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. याठिकाणी अरविंद केजरीवाल यांनी पीडित कुटुंबाचीही भेट घेतली. यानंतर सिंगला स्वीट्स येथेही भेट दिली. येथे काही महिन्यांपूर्वी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही सिंगला स्वीट्ससमोर उभे आहोत, हे खूप व्यस्त मार्केट आहे. काही महिन्यांपूर्वी सिंगला स्वीट्स येथे दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. शूट आऊटच्या काही दिवस आधी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. शूट आऊटनंतर पुन्हा फोन आला आणि तुम्हाला काहीही होऊ शकते, अशी धमकी दिली. दिल्लीत असे गोळीबार सामान्य झाले आहेत. नागलोईला गेलो होतो, तिथेही गोळीबार झाला होता. यावर्षी 160 खंडणीचे कॉल आले आहेत, जे पोलीस रेकॉर्डमध्ये आले आहेत. अनेकजण भीतीमुळे सांगत नाहीत.

सध्या दिल्लीत दहशतीचे वातावरण आहे. आपण अशी दिल्ली कधीच पाहिली नव्हती. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत. आपल्याला शांततेत राहायचे आहे. काही लोक इतर राज्यात व्यवसाय घेऊन जात आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, हे गँगस्टर 17-17 वर्षांच्या मुलांचा वापर करत आहेत. दुसरीकडे, बेरोजगारी पसरत असून अशा कामात बेरोजगार मुलांना कामाला लावले जात आहे. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचे आहे की, आम्हाला राजकारण नको आहे. तुम्हाला वाटेल ते काम करा, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला.

नरेश बालियान यांच्या अटकेवरूनही हल्लाबोलआपचे आमदार नरेश बालियान यांनी अटक करण्यात आली आहे. या अटकेचा संदर्भ देत अरविंद केजरीवाल म्हणाले की, नरेश बालियान यांना 35-40 वेळा धमकीचे फोन आले होते. पीडित हे आमदार असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा कोणता संदेश दिला जात आहे? तुम्हाला धमक्या दिल्यास आणि तुम्ही तक्रार केल्यास तुम्हाला अटक केली जाईल. पीडित लोकांना आपण संरक्षण दिले पाहिजे, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी