शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

समुद्राची पातळी वाढल्याने भारतात चार कोटी लोकांना धोका

By admin | Published: May 21, 2016 4:33 AM

वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे.

संयुक्त राष्ट्रे : वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे. त्याचवेळी समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने २0५0पर्यंत भारतातील ४ कोटी लोकांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात म्हटले आहे. ह्यजागतिक पर्यावरणीय पूर्वानुमान : (जीईओ-६) क्षेत्रीय आकलनह्ण या शीर्षकाखाली अहवालात ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. हवामानातील बदलाचा सर्वांत वाईट परिणाम पॅसिफिक आणि दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियावर होण्याचा अंदाज आहे. २0५0पर्यंत समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जगभरातील १0 देशांतील नागरी वस्त्यांवर परिणाम होणार आहे. त्यात सर्वाधिक परिणाम एशिया प्रशांत क्षेत्रातील सात देशांवर होईल, असे हा अहवाल म्हणतो. वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे चीन, भारत, थायलंड यांसारख्या देशांत आणि त्यातही खासकरून त्यांच्या अतिशहरीकृत भागांत भविष्यात विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भारतातील मुंबई, कोलकाता; चीनमधील गुआंगझो आणि शांघाय; बांगलादेशातील ढाका; म्यानमारमधील यंगून; थायलंडमधील बँकॉक आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी व हाईप्लेंग या शहरांना धोका आहे. या सर्व ठिकाणी २0७0मध्ये किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा मुकाबला करावा लागेल, असेही हा अहवाल म्हणतो. या शहरांपैकी अनेक शहरे किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा सामना पूर्वीपासूनच करीत आहेत; मात्र त्याची क्षमता आता मर्यादित होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरणविषयक अधिवेशन पुढील आठवड्यात नैरोबीत होणार आहे. त्यापूर्वी हा अहवाल जारी करण्यात आला आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट आणि हवामानातील बदल यामुळे लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. २0५0पर्यंत भारत, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया आणि फिलीपाईन्समधील ह्यवादळकेंद्रित प्रदेशह्ण होतील. त्यामुळे ५ कोटी ८0 लाख लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल. सर्वांत जास्त परिणाम होणाºया देशांत भारत प्रथम क्रमांकावर राहील. समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने भारतातील ४ कोटी लोकांना धोका निर्माण होईल. त्यानंतर बांगलादेश अडीच कोटी, चीन दोन कोटी, फिलिपाईन्सच्या जवळपास दीड कोटी लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या शहरीकरणामुळे किनारपट्टीतील वस्त्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे या किनारपट्टीवरील प्रदेशाची क्षमता कमालीची प्रभावित झाली आहे. तेथील धोका वाढला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.