शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

बँक कर्मचाऱ्याच्या वरातीत पोलिसांचा मोठा फौजफाटा; ड्रोनने गावावर पाळत, २० वर्षापूर्वीच्या घटनेनं निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:49 IST

राजस्थानमध्ये एका नवरदेवाच्या वरातीदरम्यान मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Rajasthan Police:राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात एका लग्नात आलेला ७५ पोलिसांचा फौजफाट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दलित वराच्या लग्नाच्या मिरवणुकीत कोणताही वाद होऊ नये, यासाठी पोलिसांचा ताफा येथे दाखल झाला होता. अजमेरमध्ये वराच्या लग्नाची मिरवणूक कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली. लग्नाच्या मिरवणुकींपेक्षा पोलिसांची संख्या जास्त होती. या वरातीमध्ये जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपक कुमार देखील सामील झाले होते. २० वर्षांपूर्वी झालेल्या वादामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून वराने सुरक्षेची मागणी केली होती.

२१ जानेवारी रोजी हे लग्न पार पडलं. लग्नाच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी संपूर्ण टीमसोबत पोहोचले होते. या वरातीमध्ये उपविभाग अधिकारी  देवीलाल यादव, तहसीलदार ममता यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ दीपक कुमार, पोलीस उपअधीक्षक जर्नेल सिंग आणि जवळपासच्या अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. मोठ्या बंदोबस्तात पोलिसांची पथके लग्नासाठी दाखल झाली होती. त्यानंतरच अजमेरच्या श्रीनगर गावातून नवरदेव लोकेशची लग्नाच्या वरात लवेरा गावात पोहोचली.

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात हा विवाहसोहळा कोणत्याही वादविना पार पडला. कोणत्याही अडथळ्याशिवाय लोकेशची घोडीवर लग्नाची वरात काढण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ दीपक कुमार यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे सांगितले.

कोणताही तणाव किंवा वाद होऊ नये म्हणून ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण गावावर नजर ठेवण्यात आली होती. सुमारे २० महिला कॉन्स्टेबलही या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. लग्नाच्या मिरवणुकीपेक्षा पोलिसांची संख्या जास्त दिसली. कडेकोट बंदोबस्तात लोकेश रेगर याच्या लग्नाची वरात दुपारी अडीचच्या सुमारास लग्नस्थळी पोहोचली.

लवेरा गावातल्या वधूच्या वडिलांनी नवरदेव घोडीवर आल्यावर वाद होण्याची भीती व्यक्त केली होती. मुलगी अरुणा हिचे लग्न श्रीनगर गावातील लोकेशसोबत ठरलं होतं. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. त्यासाठी त्यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे अर्जही दिला होता. 'माझ्या समाजात भीती होती आणि त्यामुळे आम्ही पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. माझ्या बहिणीच्या लग्नातही २० वर्षांपूर्वी वाद झाला होता, असं मुलीचे वडील नारायण यांनी सांगितले.

२० वर्षांपूर्वी काय घडलं?

जुलै २००५ मध्ये, नारायण यांची बहीण सुनीता हिच्या लग्नात, वरच्या जातीतील लोकांनी घोड्यावरून वरात काढण्यास विरोध केला होता. त्यावेळीही पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून बंदोबस्त ठेवला होता. मात्र असे असतानाही विशेष वर्गाच्या दबावाखाली घोडी मालक घोडीसह विवाह सोहळ्यातून गायब झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली होती. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस