शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

अमित शाह यांनी सांगितली पंडित जवाहरलाल नेहरूंची सर्वात मोठी चूक; केला बडा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:25 IST

काँग्रेसला निशाण्यावर घेत अमित शाह म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी देशात यूपीए सरकार होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी देशाचे भविष्य अंधकारमय केले होते.

भारतीय जनता पक्षाने स्थापनेवेळी जनतेला जी आश्वासने दिली होती, ती सर्व आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल 370 लागू करून जी सर्वात मोठी चूक केली होती. ती चूक केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी संपुष्टात आणली आणि जम्मू काश्मीरात तिरंगा फडकला, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते राजस्थानातील जयपूरमध्ये बोलत होते.

शाह म्हणाले, ''भाजप हा एक असा पक्ष आहे, जो नेत्याच्या बळावर नाही, तर बूथवरील आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकतो. नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचा डंका वाजविण्याचे काम केले आहे. यामुळे संपूर्ण देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून पंतप्रधान बनविण्यासाठी तयार आहे.''

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगांवरही केलं भाष्य -काँग्रेसला निशाण्यावर घेत अमित शाह म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी देशात यूपीए सरकार होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी देशाचे भविष्य अंधकारमय केले होते. 2014 मध्ये देशातील आणि राजस्थानच्या जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याचे काम केले आणि 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणला.

काय म्हणाले अमित शाह? - अमित शाह म्हणाले, 2014 मध्ये 55% मतदानासह 25 च्या 25 जागाही राजस्थानातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या होत्या. त्यानंतर, 2019 मध्ये मतांची टक्केवारी वाढून 61% झाली. पुन्हा सर्वच्या सर्व 25 जागा भाजपला मिळाल्या. आता पुन्हा नरेंद्र मोदी आले आहेत. यावेळी 70% मतांसह 25 च्या 25 ही जागा जिंकून हॅट्रिक लगणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी