शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश ? वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ

By admin | Published: February 06, 2017 9:54 AM

रजनीकांत यांनी ताकद विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 6 - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी काहीही केलं की खळबळ माजतेच, पण सध्या त्यांनी 'ताकद' विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे. यामुळे रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रजनीकांत यांनी मात्र स्पष्टीकरण देत आपण 'ताकद' शब्दाचा प्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचं म्हटलं आहे. 
 
(सुपरस्टार रजनीकांतला भिकारी समजून दिली १० रुपयांची नोट)
(भेट दोन रजनीकांतची)
 
रजनींकात स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करतील असे अंदाज लावले जात आहेत. यासाठी दक्षिण भारतात पोहचण्याचा प्रयत्न करु पाहणा-या भाजपाची साथ त्यांना मिळू शकते. तामिळनाडूतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रजनीकांत नाराज असल्याचं अनेक लोकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरील अनेकांनी याचा संबंध जयललितांच्या निधनाशी जोडला असून त्यामुळेच ते नाराज असल्याचा दावा केला आहे. 
 
(अम्मांनंतर ‘चिनम्मा’)
 
तामिळनाडूत अम्मांनंतर आता चिनम्मा यांचे राज्य असणार असून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. रजनीकांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या परिस्थितीतून राज्याला वाचवण्याचं आवाहन केलं आहे. 
 
रजनीकांतच्या एका वक्तव्यामुळे झाला होता जयललितांचा दारुण पराभव - 
रजनीकांत सध्या जयललितांचं गुणगाण गात असले तरी 1996 रोजी त्यांनीच केलेल्या एका वक्तव्यामुळे जयललितांचा दारुण पराभव झाला होता. 'जयललिता यांना जर सत्ता मिळाली, तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही,' असं वक्तव्य रजनीकांत यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर 1996 ची निवडणूक जयललिता हारल्या होत्या. 
 
मात्र 10 वर्षानंतर रजनीकांत यांचं मत बददलं आणि जयललितांचं कौतुक करताना 'अष्टलक्ष्मीचा अवतार' असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र यानंतरही दोघांचं घर जवळ असूनही रजनीकांत यांनी जयललितांपासून अंतरच ठेवलं. 
2014 रोजी लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीनंतरही रजनीकांत राजकारणात सक्रीय होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र रजनीकांत यांनी यासाठी नकार दिला. 
 
तामिळनाडूत प्रवेश करण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत आहे. यासाठी रजनीकांत यांना मनवण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु आहे. जयललिता यांच्या निधनानंतर या प्रयत्नांना जोर आला आहे असं सुत्रांकडून कळलं आहे. 
 
दुसरीकडे रजनीकांत यांनी मात्र आपण 'ताकद' शब्दप्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'जर प्रसिद्धी आणि पैशाला एकीकडे ठेवून, तुम्ही अध्यात्माशी जोडले जाणार का ? असा सवाल मला कोणी विचारला, तर मी अध्यात्म निवडेन. कारण अध्यात्मात ताकद आहे. चुकीचं समजू नका पण मला ताकद आवडते,' असं रजनीकांत बोलले आहेत.