शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

रजनीकांत, कमल हसन यशस्वी राजकारणी बनतील असे वाटत नाही - मणीशंकर अय्यर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 17:51 IST

राजकारणात उतरलेले तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन जनमानसाची पकड घेणारे प्रभावी राजकारणी बनतील असे वाटत नाही.

ठळक मुद्देरजनीकांत एक चांगला माणूस आहे अशा चांगल्या माणसांची आज राजकारणात आवश्यकता आहे. दक्षिणेतील यशस्वी अभिनेते शिवाजी गणेशन, कॅप्टन विजयकांथ राजकारणात कसे अपयशी ठरले त्याची त्यांनी उदहारणे दिली.

नवी दिल्ली - राजकारणात उतरलेले तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन जनमानसाची पकड घेणारे प्रभावी राजकारणी बनतील  असे वाटत नाही असे मत काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या मणी शंकर अय्यर यांनी व्यक्त केले. इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. रजनीकांत यांच्या राजकारणात उतरण्याचे सर्वांनीच स्वागत केले आहे. 

रजनीकांत एक चांगला माणूस आहे अशा चांगल्या माणसांची आज राजकारणात आवश्यकता आहे. पण चांगली माणस देशाची पंतप्रधान होतील अशी अपेक्षा करण म्हणजे मणीशंकर अय्यरने देशाच्या पंतप्रधानपदाच स्वप्न पाहण्यासारख आहे. असं घडू शकत नाही असे अय्यर म्हणाले. एमजीआर आणि जयललिता द्रविडीयन चळवळीशी संबंधित होते. त्यांनी त्यांच्या सिनेक्षेत्राच्या प्रभावाचा राजकारणात पुरेपूर वापर केला त्यामुळे ते राजकारणात यशस्वी ठरले असे अय्यर म्हणाले. 

दक्षिणेतील यशस्वी अभिनेते शिवाजी गणेशन, कॅप्टन विजयकांथ राजकारणात कसे अपयशी ठरले त्याची त्यांनी उदहारणे दिली. सिनेमामध्ये त्यांची कारकीर्द यशस्वी होती पण तेच यश त्यांना राजकारणात लाभले नाही. रजनीकांत तामिळनाडूमध्ये काँग्रेसला हरवतील पण अन्य पक्षांना पराभूत करणे त्यांना जमणार नाही असे मणीशंकर अय्यर म्हणाले.  

गुजरात निवडणुकीच्यावेळी मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नीच माणूस म्हटले होते. मोदी नीच आणि असभ्य माणूस आहे अशी विधाने त्यांनी केली होती. गुजरात निवडणुकीत त्यांच्या या विधानाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने लगेचच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याआधी मणिशंकर अय्यर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना 'चायवाला' म्हटलं होतं.                           

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरKamal Hassanकमल हासन