शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनीही केंद्राला झुकविले, ३३ वर्षांनंतर झाली घटनेची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 06:45 IST

महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता.

नवी दिल्ली : आपले वडील महेंद्रसिंग टिकैत यांनी ३३ वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. १९८८ साली महेंद्रसिंग टिकैत यांनी केलेल्या शेतकरी आंदोलनापुढे तत्कालीन केंद्र सरकाराला झुकावे लागले होते. आता राकेश टिकैत यांच्या पुढाकाराने होत असलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला माघार घेऊन तीन नवे कृषी कायदे रद्द करावे लागले. 

महेंद्रसिंग टिकैत यांनी १९८८ साली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या बोट क्लब येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी तिथे जमले होते. विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सारा परिसर शेतकऱ्यांनी व्यापला होता. त्यावेळी लाल किल्ला परिसरात शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला होता. महेंद्रसिंग टिकैत यांनी सादर केलेल्या ३५ मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन केंद्रातील राजीव गांधी सरकारने दिले. केंद्र सरकार झुकल्यानंतर महेंद्रसिंग टिकैत यांनी आंदोलन मागे घेतले होते. 

शेतकऱ्यांच्या सामर्थ्यापुढे केंद्र सरकार झुकल्याच्या घटनेची पुनरावृत्ती २०२१ साली महेंद्रसिंग टिकैत यांचे पुत्र राकेश टिकैत यांच्यामुळेही झाली. तीन नवे कृषी कायदे मोदी सरकारने संसदेत मंजूर केले. मात्र, हे कायदे अन्यायकारक असल्याचा शेतकरी आंदोलकांचा आक्षेप होता.  आंदोलक किमान हमीभावासाठीही आग्रही आहेत. त्यात ज्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले, त्यामध्ये भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांचाही समावेश आहे. सुमारे वर्षभर सुरू असलेल्या आंदोलनात २६ जानेवारीला लाल किल्ला परिसरात हिंसाचार झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांना नोटीस बजावली. 

शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय --  गाझीपूर येथील सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्याचे टिकैत यांनी संकेत दिले होते. -  मात्र, देशभरातील शेतकरी आंदोलनाचा रेटा पाहून केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे मागे घेतले. शेतकऱ्यांचा हा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी व्यक्त केली होती.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलन