शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अश्रूंची झाली फुले! राम मंदिर परिसरात उमा भारतींना पाहताच साध्वी ऋतंभरांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 13:54 IST

Ram Mandir : राम मंदिर आंदोलनात आघाडीवर राहणाऱ्या दोन फायरब्रँड नेत्या साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती आज मंदिर परिसरामध्ये भेटल्या तेव्हा दोघींनाही आपल्या भावना अनावर झाल्या. दोघींनीही एकमेकींची गळाभेट घेट अश्रूंना मोकळी वाट करून दिली. 

अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये राम मंदिर आंदोलनात सक्रिय भूमिका घेणाऱ्या अनेक नेत्यांचाही समावेश आहे. दरम्यान, राम मंदिर आंदोलनात आघाडीवर राहणाऱ्या दोन फायरब्रँड नेत्या साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती आज मंदिर परिसरामध्ये भेटल्या तेव्हा दोघींनाही आपल्या भावना अनावर झाल्या. दोघींनीही एकमेकींची गळाभेट घेट अश्रूंना मोकळी वाट करून दिली. 

आता सोशल मीडियावर या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये उमा भारतींना भेटल्यानंतर साध्वी ऋतंभरा ह्या बराच वेळ रडताना दिसत होत्या. त्यानंतर उमा भारती यांनी साध्वी यांना सावरले. त्यांचे अश्रू पुसले. त्यावेळी साध्वी निरंजन ज्योती ह्याही या दोघींना पाहून भावूक झाल्या आणि त्यांच्याजवळ आल्या. 

राम मंदिर आंदोलनाचा इतिहास पाहिल्यास दोन्ही नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. काही दिवसांपूर्वी उमा भारती यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ५०० वर्षांच्या संघर्षामध्ये आम्हालाही भागीदारीची संधी मिळाली. हा माझ्यासाठी परमानंदाचा विषय आहे. 

राम मंदिर आंदोलन ऐन भारात असताना साध्वी ऋतंभरा यांनी सौगंध राम की खाते हे मंदिर वही बनाएंगे अशी घोषणा दिली होती. अखेर अनेक वर्षे चाललेल्या न्यायालयीन संघर्षानंतर अयोध्येतील जन्मभूमीवर राम मंदिर उभं राहिलं आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या