शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

'अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे तर...' लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 9:50 PM

रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी काय म्हणाले, पाहा...

Ram Mandir Inauguration: अयोध्येत येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन आणि रामललाचा प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) सोहळा होत आहे. तत्पुर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिर आंदोलनाची ज्वाला पेटवणारे लालकृष्ण अडवाणी (Lal Krish Advani) यांचे महत्त्वपूर्ण विधान समोर आले आहे. या सोहळ्यांना त्यांनी दिव्य स्वप्नाची पूर्तता म्हटले आणि रामललाच्या अभिषेकाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असल्याचेही सांगितले. 

लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांनी राष्ट्रधर्म या हिंदी मासिकाशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी भव्य राम मंदिर बांधल्याबद्दल आणि हा संकल्प पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केले. यावेळी अडवाणी यांनी त्यांच्या रथयात्रेचाही उल्लेख केला आहे. अडवाणी म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिर होणार, हे नियतीनेच ठरवले होते. रथयात्रा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी मला समजले की मी फक्त एक सारथी आहे. हा रथ स्वतःच रथयात्रेचा मुख्य संदेशवाहक आहे. 

पंतप्रधान मोदींचे आभार मानले

दरम्यान, अडवाणी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली आणि प्राण प्रतिष्ठाच्या भव्य कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती जाणवत असल्याचे सांगितले. जुन्या काळाची आठवण करुन अडवाणी म्हणाले की, आज रथयात्रेला 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 सप्टेंबर 1990 रोजी सकाळी रथयात्रेला सुरुवात करताना वाटले नव्हते की, ही यात्रा देशव्यापी चळवळीचे रुप घेईल. विशेष म्हणजे, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अडवाणींचे सहाय्यक होते आणि संपूर्ण रथयात्रेत सोबत राहिले. 

रथयात्रेद्वारे देशभरात फिरत होतो, तेव्हा अनेक लोक मला भेटायचे. तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला राम मंदिराचे स्वप्न दिसायचे. त्यांनी अनेक वर्षे आपल्या इच्छा मनात दाबू ठेवल्या होत्या. आता 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन होत आहे आणि यातून देशातील लाखो करोडो रामभक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामललाच अभिषेक करतील, तेव्हा ते भारतातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतील. मी प्रार्थना करतो की हे मंदिर सर्व भारतीयांना श्रीरामाचे गुण अंगीकारण्याची प्रेरणा देईल, असं अडवणी यावेळी म्हणाले.

लालकृष्ण अडवणींची रथयात्राभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी यांनी आपल्या रथयात्रेतून राम मंदिर आंदोलनाची ज्योत पेटवली. 25 सप्टेंबर 1990 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सोमनाथ ते अयोध्येपर्यंत 10 राज्यांतून निघालेल्या अडवाणींच्या यात्रेने लोकांमध्ये राम मंदिराचे बीज पेरले होते. 10 हजार किलोमीटरच्या या रथयात्रेने देशातील लोकांमध्ये लपलेले हिंदुत्व जागृत केले. आज त्या रथयात्रेचे फळ देशातील करोडो राम भक्तांना मिळत आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा