शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Ram-Setu: 'राम-सेतू' राष्ट्रीय स्मारक घोषित होणार ? लवकरच सर्वोच्च न्यायालय सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 14:23 IST

Ram Setu Bridge: भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यूपीए सरकारच्या काळात 'राम-सेतू'च्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती.

Ram Setu Bridge: भारत आणि श्रीलंकादरम्यान असलेल्या 'राम-सेतू'ला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे आणि त्याचे संरक्षण व्हावे, या मागणीवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांना आश्वासन दिले की, या प्रकरणाची तपशीलवार सुनावणी केली जाईल. 

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात सुरू झालेल्या 'सेतू समुद्रम' प्रकल्पांतर्गत जहाजांना जाण्यासाठी राम-सेतू पाडण्यात येणार होता. पण, न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. तेव्हापासून राम-सेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे. 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर एनडीए सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, राम-सेतूचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा निर्णय राष्ट्रहितासाठी घेण्यात आला आहे. सरकार सेतू समुद्रम प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग शोधत आहे. मात्र, राम-सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याबाबत सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

काय आहे राम सेतू?

तामिळनाडूमधील रामेश्वरम आणि श्रीलंकेतील मन्नार यांच्यामध्ये असलेल्या चुनखडीच्या साखळीला राम-सेतू म्हणतात. भूगर्भशास्त्रज्ञ मानतात की पूर्वी ही साखळी पूर्णपणे समुद्राच्या वर होती. यावरून श्रीलंकेपर्यंत चालता येत असे. हिंदू धर्मानुसार, हा सेतू रामायण काळात भगवान रामाच्या सैन्याने बांधलेला पूल मानला जातो. जगातील अनेक देश याला मानवनिर्मित असल्याचे मानतात. अॅडम्स ब्रिज असेही म्हणतात.

टॅग्स :ramayanरामायणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी