शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर व्हावे!

By admin | Published: December 05, 2014 1:57 AM

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात आले पाहिजे, असे सांगून राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातून आपण बाहेर पडत

लखनौ : अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात आले पाहिजे, असे सांगून राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातून आपण बाहेर पडत असल्याचे या खटल्यातील प्रमुख वादी हाशिम अन्सारी यांनी बुधवारी जाहीर केले. बाबरी मशीद विध्वंसाला २२ वर्षे पूर्ण होत असतानाच वादी अन्सारी यांनी खटल्यातून अंग काढण्याचा निर्णय घेतला आहे, हे विशेष.‘या मुद्याचे राजकारण करण्यात आले आहे आणि आता हा मुद्दा धार्मिक राहिलेला नाही. या खटल्यातून माघार घेण्याची माझी इच्छा आहे. माझी ही इच्छा मी लेखी स्वरूपात सर्वोच्च न्यायालयाला कळविणार आहे. ६ डिसेंबरला मी ‘यौमे गम’ (शोक दिवस) कार्यक्रमात भाग घेणार नाही. त्या दिवशी मी आपल्या घरीच राहीन,’ असे अन्सारी म्हणाले.‘आजम खानसारखे राजकारणी हा मुद्दा जटिल बनविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे मी खटल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात आले पाहिजे. रामलल्लाची तंबूतून सुटका झाल्याचे आणि त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्यात आल्याचे मला बघायचे आहे,’ असे अन्सारी यांनी म्हटले आहे. बाबरी मशीद पाडणाऱ्या आरोपींना शिक्षा करण्याचे अभिवचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिले तर आपण या मुद्यावर शांततापूर्ण वाटाघाटीसाठी त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत, असेही अन्सारी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकत्र बसून चर्चा करण्यास तयार आहे. परंतु मोदींनी या मुद्यावर चर्चा सुरू होण्याआधी बाबरी मशीद विध्वंस खटला जलद गती न्यायालयापुढे आणावा, अशी माझी इच्छा आहे.’मागील २२ वर्षांपासून लखनौ आणि रायबरेली येथील विशेष सीबीआय न्यायालयात बाबरी मशीद विध्वंसातील आरोपींविरुद्ध खटला सुरू आहे. हे न्याय नाकारणेच आहे. ठराविक वेळेच्या आत आरोपींचा शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन मोदींनी दिले तर शांततापूर्ण चर्चा करण्यास आमची तयारी आहे, असेही अन्सारी म्हणाले. (वृत्तसंस्था)