शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

आधीच सांगितलं होतं, मुस्लीम बहुल भागात शोभायात्रा काढू नका; हावडा हिंसाचारावर ममता म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:39 PM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, हावडा येथे हिंसाचार झाला कारण मिरवणुकीचा मार्ग चुकीचा होता. त्या म्हणाले, "त्यांनी मार्ग का बदलला आणि एका विशिष्ट समाजावर हल्ला करण्यासाठी ते अनधिकृत मार्गाने का गेले?

पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या मुहूर्तावर झालेल्या हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केले आहे. या हिंसाचारावरून त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, मुस्लीम बहूल भागातून यात्रा काढताना सावधगिरी बाळगा, अशा भागातून जाणे टाळा, असा इशारा आधीच दिला होता. यावेळी, मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आल्याचा दावाही ममता यांनी केला. तसेच, यात पोलिसांची काही संशयास्पद भूमिका आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपवर निशाणा साधताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, "ते सांप्रदायिक दंगली घडविण्यासाठी राज्याबाहेरून गुंडांना बोलावत असतात. त्यांच्या मिरवणुका कोणीही रोखल्या नाहीत, पण त्यांना तलवारी आणि बुलडोझर घेऊन मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. हावडा येथे असे करण्याची त्यांची हिम्मत कशी झाली?" माध्यमांतील वृत्तांनुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने गुरुवारी सायंकाळी हावडामधील शिबपूर येथे मिरवणूक काढली होती. यादरम्यान प्रचंड हिंसाचार झाला. हिंसाचाराचे कारण समोर आलेले नाही. यावेळी अनेक वाहनेही पेटवून देण्यात आली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, हावडा येथे हिंसाचार झाला कारण मिरवणुकीचा मार्ग चुकीचा होता. त्या म्हणाले, "त्यांनी मार्ग का बदलला आणि एका विशिष्ट समाजावर हल्ला करण्यासाठी ते अनधिकृत मार्गाने का गेले? ते इतरांवर हल्ला करतील आणि कायदेशीर हस्तक्षेपाने त्यांना दिलासा मिळेल, असे त्यांना वाटत असेल, तर त्यांना हेही समजायला हेवे की, त्यांना जनता एक दिवस नाकारेल. ज्यांनी काही चूक केली नाही त्यांना अटक होणार नाही. भाजपच्या कार्यकरत्यांमध्ये लोकांच्या घरावर बुलडोझर चालविण्याची हिंमत कशी असे?, असा सवालही ममता यांनी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRam Navamiराम नवमीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस