शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
4
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
5
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
6
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
7
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
8
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
9
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
10
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
11
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
12
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
13
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
14
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
15
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
16
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
17
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
18
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
19
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

Ramcharitmanas Row: रामचरितमानसच्या प्रती जाळल्या; बागेश्वर सरकारचं हिंदूंना थेट आवाहन, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 6:25 PM

Ramcharitmanas Bageshwar Sarkar : रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे.

रामचरितमानसच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशात वादाला तोंड फुटले आहे. अनेक ठिकाणांवरून पवित्र रामचरितमानसाच्या प्रती जाळल्याचे आणि फाडल्याचे वृत्त आहे. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनीही रामचरितमानसवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. आता बागेश्वर सरकार अर्थात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदूंच्य या पवित्र ग्रंथावरू सुरू झालेल्या वादावर प्रतिक्रिया देली आहे.

रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे. यामुळे आता प्रत्येक हिंदू जागृत होण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर ज्या लोकांनी रामचरितमानसचा अपमान केला, अशा लोकांसोबत संबंध ठेवायचे की नाही, त्यांच्यासंदर्भात तुम्हाला स्वत:लाच विचार करावा लागेल, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

बागेश्वर सरकारने म्हटले आहे की, रामचरितमानसचा अपमान करणाऱ्यांनी भारत सोडायला हवा. या लोकांनी भारतात राहू नये. रामचरितमानसचा अपमान करून या लोकांनी भारतात राहण्याचा अधिकार गमावला आहे. यांच्या विरोधात सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. याच बरोबर त्यांनी रामचरितमानस हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित व्हावा अशी मागणीही केली आहे. यासंदर्भात धीरेंद्र शास्त्री यांनी सरकारकडे निवेदनही केले आहे.

रामचरितमानसच्या प्रती जाळल्याच्या घटनांवर राग व्यक्त करत, हे एक 'अंतरराष्ट्रीय षडयंत्र' आहे. हा प्रकार म्हणजे सनातन धर्माविरोधातील कट आहे. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व सनातनींना संघटित व्हावे लागेल, असेही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामHinduहिंदू