शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; हिंदू महासभेच्या नेत्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 10:28 IST

स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक कथितपणे भेदभाव करणारे म्हटल्यानंतर एक दिवसानंतर अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापून टाकणाऱ्याला 51,000  रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

बिहारमधून सुरू झालेला रामचरितमानसचा वाद आता उत्तर प्रदेशात पोहोचला आहे. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसच्या चौपाईला भेदभाव करणारी असल्याचे म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी केलीआहे. यानंतर हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक कथितपणे भेदभाव करणारे म्हटल्यानंतर एक दिवसानंतर अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापून टाकणाऱ्याला 51,000  रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

"जर एखाद्या व्यक्तीने समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापली तर त्याला बक्षीस म्हणून 51,000 रुपयांचा धनादेश दिला जाईल. त्यांनी आमच्या धार्मिक ग्रंथाचा अपमान केला आहे. याचबरोबर, त्यांनी हिंदूंच्या भावनाही दुखावल्या आहेत", असे महासभेचे आग्रा जिल्हा प्रभारी सौरभ शर्मा म्हणाले. इतकेच नाही तर अखिल भारतीय हिंदू महासभेने सोमवारी आग्रा येथे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विधानाचा निषेध केला.

दरम्यान, रामचरितमानसबाबत स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा त्यांच्याच समाजवादी पक्षाच्या आमदारांनी निषेध केला आहे.  या प्रकरणी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती देणार असल्याचे समाजवादी पक्षाच्या आमदारांनी सांगितले.  रामचरितमानस हा असा ग्रंथ आहे, जो जगभर वाचला जातो आणि विचार केला जातो, असे समाजवादी पक्षाचे नेते मनोज पांडे म्हणाले. 

याचबरोबर, समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे म्हणाले की, हे पुस्तक माणसाला नैतिक मूल्ये आणि परस्पर संबंधांचे महत्त्व सांगते. आम्ही केवळ रामचरितमानसच नाही तर बायबल, कुराण आणि गुरु ग्रंथ साहिब यांचाही तितकाच आदर करतो.  हे ग्रंथ आपल्याला सर्वांसोबत राहायला शिकवतात. तसेच, अखिलेश यादव सध्या उत्तराखंडमध्ये आहेत आणि त्यांना याची जाणीव आहे.

काय म्हणाले होते स्वामी प्रसाद मौर्य?"रामचरितमानसच्या काही श्लोकांमध्ये जात, वर्ण आणि वर्गाच्या आधारावर समाजातील कोणत्याही घटकाचा अपमान केला गेला असेल तर तो धर्म नसून अधर्म आहे.  यामुळे केवळ भाजपलाच नव्हे, तर साधूसंतांवरही हल्ले करण्यास प्रवृत्त केले जाते.  रामचरितमानसच्या काही ओळींमध्ये तेली, कुम्हार यांसारख्या जातींची नावे सांगितल्यामुळे या जातींच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात", असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले होते. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुस्तकाच्या या भागावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी