शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 22:03 IST

Ramdas Athawale on Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते EVM वर प्रश्न उपस्थित करत आहेत.

Ramdas Athawale on Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता EVM हँकिंगचा मुद्दा समोर आला आहे. यावरुन राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, आता केंद्री मंत्री रामदास आठवले यांनी राहुल यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, 'सलग तिसऱ्यांदा सत्तेबाहेर असल्याने राहुल गांधी EVM हॅकिंगचा मुद्दा उपस्थइत करत आहेत. ईव्हीएम भाजपने नाही, काँग्रेस  सरकारने आणले होते. ईव्हीएम हॅक झाल्याचा मुद्दा विरोधक वारंवार उपस्थित करत असतील, तर सर्व विरोधी पक्षांनी एकमताने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनेच निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले पाहिजे. निवडणूक आयोगानेही वारंवार ईव्हीएम हॅक करून दाखवा, असे आव्हान दिले होते, पण कुणीच पुढे आले नाही, अशी टीका आठवले यांनी केली. 

इंडिया आघाडीने 234 जागा कशा जिंकल्या?ते पुढे म्हणतात, लोकशाहीत ईव्हीएमवर वारंवार प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. रवींद्र वायकर यांच्या विजयात राहुल गांधी ईव्हीएम बिघाडाचा ठपका ठेवत असतील, तर इंडिया आघाडी आणि काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या, याचाही तपास व्हायला हवा. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसचे यूपीए सरकार अल्पमतात होते. काँग्रेसकडे बहुमत नव्हते, तरीही सरकार 10 वर्षे चालू राहिले. त्यावेळी एनडीए किंवा भाजपने प्रश्न उपस्थित केला होता का? ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप केला होता का? यावेळी काही चुका झाल्या, त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही, मात्र 2014-19 मध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतरही एनडीएचे सरकार होते. यावेळीही एनडीएचे सरकार आहे. आम्ही आमच्या चुका सुधारू आणि 2029 मध्ये मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

संजय राऊत यांवर टीकालोकसभा अध्यक्ष हे महत्त्वाचे पद आहे. चंद्राबाबू नायडू हे प्रामाणिक आणि चांगले नेते आहेत. ते एनडीएसोबतच राहतील. चंद्राबाबूंकडे सभापतीपदासाठी चांगला उमेदवार असेल किंवा भाजपकडे असेल, तर एनडीएमध्ये चर्चा होईल. आम्हाला इंडिया आघाडीची गरज नाही. त्यांनी स्वतःची काळजी करावी. संजय राऊत, तुम्ही स्वतःची काळजी करा. हे सर्वजण चंद्राबाबू नायडूंना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण असे काहीही होणार नाही. संसदेचे अधिवेशन सुरू होऊ द्या, तुम्हाला कळेल. संजय राऊत किंवा इंडिया आघाडीकडे लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार असेल, तर त्यांनी उभा करावा, असे आव्हान त्यांनी यावेळई दिले. 

आगामी विधानसभेबाबत काय म्हणाले?आगामी विधानसभा निवडणूक महायुतीपूर्ण ताकदीने लढवेल आणि जिंकेल. लोकसभा निवडणुकीत राज्यात कुठे चुका झाल्या? आम्हाला कमी मते का मिळाली? या सर्वांचा आढावा घेतला जात आहे, त्यामुळे दुप्पट ताकदीने निवडणूक लढवू. लोकसभेसारखा निकाल विधानसभेत येणार नाही. मी दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यावेळी मी आमच्या पक्ष आरपीआयला राज्यातील आगामी मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक मंत्रीपद आणि विधानसभा निवडणुकीत 8-10 जागांची मागणी केली होती. काही जागा कमी-अधिक होऊ शकतात. लोकसभा निवडणूक निकाल आणि एमएलसी निवडणुकीनंतर यावर चर्चा केली जाईल, असे फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचीही तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहितीदेखील आठवले यांनी यावेळी दिली.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालRamdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा