शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रामनवमी: सुनसान रस्ते, अयोध्यावासी म्हणाले गेल्यावर्षी पेक्षाही गर्दी कमी; प्रशासन तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 23:20 IST

Ayodhya Ram Navami: प्राणप्रतिष्ठेवेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते.

काही महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लाखोंची गर्दी ओसंडली होती. मंदिर प्रशासनाला रात्रंदिवस मंदिर सुरु ठेवावे लागले होते. चेंगराचेंगरी होते की काय एवढी भीषण परिस्थिती होती. यामुळे यंदा रामनवमीला १५ लाखांच्यावर रामभक्त अयोध्येत दर्शनाला येतील असा अंदाज मंदिर प्रशासनाने लावला होता. परंतु, आजच्या दिवशी अयोध्येतील रस्ते ओस पडल्याचे चित्र होते. 

राम मंदिराचा प्रभाव आजबाजुच्या राज्यांत पडेल असा राजकीय होरा होता. यामुळेच मंदिराचे काम अर्धवट असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली होती. यावेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते. तसेच ठिकठिकाणी रामभक्तांच्या गाड्या रोखाव्या लागल्या होत्या.

यानंतरची पहिलीच रामजन्मोत्सव असल्याने प्रशासनाने १५ लाख भक्त येणार असल्याचा दावा केला होता. परंतु याच्या उलट घडले आहे. अयोध्येच्या लोकांनी तर गेल्यावर्षीपेक्षा कमी गर्दी यंदाच्या रामनवमीला होती असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून गर्दी होणारा रामपथ सुनासुना होता. राम मंदिराच्या मुख्य गेटजवळ असलेल्या ११ नंबरच्या गेटवर देखील मंदिरात प्रवेश करणारे भक्त कमी होते. 

आलेल्या भक्तांसाठी सात दर्शन रांगांची सोय करण्यात आली होती. यापैकी पाच रांगा रिकाम्या होत्या. रामजन्मोत्सवाच्या दिवशी भक्तांची मोठी गर्दी होत असायची. परंतु यंदाचा रामजन्मोत्सव सुनासुनाच झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. आजच्या दिवशी चांगली विक्री होईल अशा आशेने दुकानदार होते, ते देखील निराश झाले होते असे व्यापारी विजय यादव यांनी सांगितले.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Navamiराम नवमीRam Mandirराम मंदिर