शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
2
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
4
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
5
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
6
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
7
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
8
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
9
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
10
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
11
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
12
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
13
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
14
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
15
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
16
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
17
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
18
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
19
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
20
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

देशभरात श्रीराम नवमीची धामधूम; बंगालसह अनेक राज्यात हाय अलर्ट; सुरक्षादल तैनात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:07 IST

Ramnavami : श्रीराम नवमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Ramnavami : श्रीराम नवमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यापासून राननवमीला नवचैनत्य प्राप्त झाले आहे. दरम्यान, यानिमित्ताने देशभरात सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे, विशेषत: ज्या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जातीय तणाव दिसून आला आहे, त्या राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. यूपी, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. गरज वाटेल तिथे, जास्तीचा फौजफाटा तैनात करुन शांतता राखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

उत्तर प्रदेशरामनवमीनिमित्त उत्तर प्रदेशातील अयोध्या शहर विशेषत: सुरक्षेबाबत सतर्क आहे. हे प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असल्याने येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी राम मंदिराभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अयोध्येला वेगवेगळ्या झोनमध्ये विभागण्यात आले असून, सर्व झोनमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. सरयू नदीच्या आसपास एनडीआरएफ आणि जल पोलीस सतर्क आहेत.

राज्याच्या इतर भागातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. प्रमुख रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच सोशल मीडियावर देखरेख वाढवण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अफवा किंवा भडकाऊ कंटेट पसरवण्यापासून रोखता येईल. कोणत्याही असामाजिक घटकाने हिंसाचार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

महाराष्ट्रराम नवमीनिमित्ताने राजधानी मुंबईत 13,500 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत, ज्यात 11,000 कॉन्स्टेबल, 2,500 अधिकारी आणि 51 सहायक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. शांतता राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल (SRPF) आणि इतर विशेष तुकड्यांच्या नऊ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईसह राज्यातील विविध लहान-मोठ्या शहरांमध्ये पोलिस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

पश्चिम बंगाल

रामनवमीनिमित्त पश्चिम बंगालमध्येही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोलकातामध्ये पाच मोठ्या मिरवणुकांसह 50 हून अधिक लहान मिरवणुका निघण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शहरात अतिरिक्त पाच हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हावडा, सिलीगुडी, मालदा आणि मुर्शिदाबाद या राज्यातील विविध जिल्ह्यांतील संवेदनशील भागात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी फ्लॅग मार्च काढून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवली जाईल, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. गेल्या काही वर्षांपासून राज्यात रामनवमीच्या मुहूर्तावर जातीय तणावाच्या घटना उघडकीस आल्या असून, या वेळी सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

झारखंड

झारखंडमध्येही रामनवमीनिमित्त सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही समाजविघातक कारवायांना वेळीच आळा घालता यावा यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाईक रॅलीसारखी कोणतीही नवीन परंपरा बंद करा, ज्यामुळे वातावरण बिघडण्याचा धोका आहे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिले आहेत. रामनवमीच्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात याची काळजी राज्यातील प्रशासनाने घेतली आहे. झारखंडमध्ये पोलीस सतर्क असून सुरक्षा व्यवस्था वाढवल्याने प्रशासन या उत्सवाबाबत पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसून येते.

बिहारबिहारमध्येही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राजधानीत रामनवमीनिमित्त पाटणा पोलिसांनी सुरक्षेसाठी ठोस तयारी केली आहे. उत्सवादरम्यान परिसरात 2500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या दोन कंपन्यांसह 800 अतिरिक्त फौजाही तैनात करण्यात आल्या आहेत. इतर राज्यांमध्येही कुठलाही अनिचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह विविध सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Ram Navamiराम नवमीMaharashtraमहाराष्ट्रwest bengalपश्चिम बंगालUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार