शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

२०१४ नंतर बँकांची ५ ट्रिलियन रुपयांची फसवणूक; केंद्र सरकार सपशेल अपयशी; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 19:01 IST

फसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका. रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

ठळक मुद्देफसवणूक होण्यापासून रोखण्यास केंद्राला अपयश, काँग्रेसची टीका.रकमेची वसुली करण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत, काँग्रेसचा सवाल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) २०२०-२१ च्या वार्षिक अहवालाच्या आधारावरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच २०१४ नंतब बँकांची ५ ट्रिलिअन रूपयांची फसवणूक झाली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. बँकांची होणारी फसवणूक रोखण्यापासून सरकारला का अपयश आलं आणि ही रक्कम वसूल करण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलत आहेत असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत गौरव वल्लभ यांनी आपल्याला आवश्यक काय आहे हे अशी विचारणा केली. "आपल्याला काय आवश्यक आहे? अर्थव्यवस्था वाचवणं, लोकांचे जीव वाचवणं की मोदी महाल उभारणं. हे आर्थिक आणि नैतिकतेच्या दृष्टीनं योग्य ठरू शकत नाही. तुम्ही केवळ तुमची जिद्द पूर्ण करत आहात," असं गौरव वल्लभ म्हणाले. "नुकताच २०२१-२१ साठी रिझर्व्ह बँकेनं आपला अहवाल सादर केला. यात अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. यात बँकांची फसवणूक झाल्याची आकडेवारीही आहे. यामध्ये २०१४-१५ नंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ २०२१-२१ मध्ये १.३८ लाख कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. २०१४-१५ च्या तुलनेत फसवणूकीची रक्कम २०१४-१५ आणि २०१९-२० दरम्यान ५७ टक्क्यांच्या दरानं वाढली," असं त्यांनी नमूद केलं. सरकार अपयशी का ठरलं?"गेल्या सात वर्षांमध्ये मोदी सरकार बँकांची होणारी फसवणूक रोखण्यात का अपयशी ठरलं. ही रक्कम परत आणण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली? बँकिंग व्यवस्थेला कमकुवत करणाऱ्यांकडून आतापर्यंत किती पैसे वसूल करण्यात आले?," असे सवाल गौरव वल्लभ यांनी केले. जर या रकमेची वसुली झाली तर गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजा रूपयांची मदत देता येऊ शळकते. देशात ५०० एम्स रुग्णालयं सुरू केली जाऊ शकतात आणि सामान्य लोकांनाही करात मदत मिळू शकते असं ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँकfraudधोकेबाजी