शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

‘नीट’च्या ग्रेसमार्कची फेरतपासणी, चार जणांची समिती गठित, नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत १५०० हून अधिक जणांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 05:52 IST

'NEET' Exam News: नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये १५००हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्क्सची फेरतपासणी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण खात्याने चार सदस्यांची एक समिती नेमली आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी दिली.

 नवी दिल्ली - नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये १५००हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्क्सची फेरतपासणी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण खात्याने चार सदस्यांची एक समिती नेमली आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी दिली. या परीक्षेतील गुणवाढीबद्दल अनेक आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेले बदल तसेच परीक्षा केंद्रांमध्ये काही कारणांनी वाया गेलेला वेळ या गोष्टींमुळे दिलेले वाढीव गुण ही विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळण्यामागची काही कारणे आहेत. मात्र नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले नाहीत, असे एनटीएने सांगितले. नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या  देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपने केली आहे, तर या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा काँग्रेसने दावा केला होता.

अन्य परीक्षार्थींना बसणार फटका : काँग्रेसविविध परीक्षांमध्ये पेपर फुटणे, हेराफेरी, भ्रष्टाचार या गोष्टी घडतात असे काँग्रेसने म्हटले आहे. भाजप युवकांची फसवणूक करत असून, त्यांच्या भविष्याशी खेळत आहे, असा आरोप काँग्रेसने केला. सहा परीक्षा केंद्रांवर काही कारणांनी दिलेला वाया गेल्याने विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले. त्यामुळे त्यांचे गुण वाढले. त्यामुळे अन्य परीक्षार्थींच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा होत आहे. मेघालय, हरयाणातील बहादुरगड, छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बलोध, गुजरातमधील सुरत आणि चंडीगड येथे ती सहा केंद्रे आहेत. 

पुन्हा परीक्षा घेण्याची  विद्यार्थ्यांची मागणी- नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गुणवाढीमुळे यंदा वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया काहीशी कठीण होणार आहे. निकालामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. - त्यामुळे या परीक्षेचा निकाल रद्द करावा व पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी काही परीक्षार्थींनी केली आहे. नीट-यूजी वैद्यकीय परीक्षा पुन्हा घ्यायची का याचा निर्णय चार सदस्यीय समिती जो अहवाल देईल त्यातील शिफारसींवर अवलंबून राहील, असे एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंह म्हणाले. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. '

प्रवेशप्रक्रियेवर परिणाम नाही : एनटीए महासंचालकवैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला. ६७ विद्यार्थ्यांना या परीक्षेत प्रथमश्रेणी मिळाली. त्यात हरयाणातील सहा जणांचा समावेश होता. यंदा या परीक्षेला २४ लाख विद्यार्थी बसले. ही विक्रमी संख्या आहे. एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंह म्हणाले की, १५००हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्क्सची तपासणीसाठी यूपीएससीचे माजी चेअरमन यांचा समावेश असलेल्या चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ग्रेस मार्क दिल्यामुळे नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पात्रता निकषांवर कोणताही परिणाम झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या गुणांच्या फेरतपासणीचा प्रवेशप्रक्रियेवर परिणाम होणार नाही, असेही सुबोधकुमार सिंह म्हणाले.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी