शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभेत काँग्रेसचे नेतेपद स्वीकारण्यासाठी तयार : शशी थरूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:15 IST

काँग्रेस पक्षाने आपल्याला लोकसभेत नेता होण्यासाठी सांगितले तर आपण नेतेपदाची जबाबदारी घेण्यास तयार आहोत. यावेळी त्यांनी प्रचारात काँग्रेसकडून झालेल्या चुका सांगितल्या.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा आता संसदेच्या सत्रावर लागल्या आहेत. काँग्रेस पक्ष सलग दुसऱ्यांदा विरोधपक्ष नेतेपदापासून दूर राहिला आहे. या व्यतिरिक्त मल्लिकार्जुन खरगे निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे लोकसभेत काँग्रेस नेता निवडण्यासाठी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. तर शशी थरुर यांनी लोकसभेत काँग्रेस नेता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तिरुअंतपुरममधून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले थरुर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने आपल्याला लोकसभेत नेता होण्यासाठी सांगितले तर आपण नेतेपदाची जबाबदारी घेण्यास तयार आहोत. यावेळी त्यांनी प्रचारात काँग्रेसकडून झालेल्या चुका सांगितल्या. काँग्रेसची या निवडणुकीतील मुख्य थीम 'न्याय' होती. मात्र न्याय योजनेची माहिती ग्राउंड लेव्हलपर्यंतच पोहोचलीच नसल्याचे थरूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सॉफ्ट हिंदुत्वावर टीका केली. न्याय योजनेनुसार देशातील गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे. पक्ष त्यांच्या मदतीसाठी विभागवार कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी विचार करू शकतो, असंही थरूर यांनी सांगितले. थरूर २००९ पासून तिरुअंनतपुरमधून काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करत आहेत. २०१४ मध्ये थरूर यांनी भाजपच्या के.ओ. राजगोपाल यांचा पराभव केला होता.

२०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत. मात्र गेल्यावेळी प्रमाणे यावेळी देखील काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ मिळवता आले नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी ५५ जागा जिंकणे आवश्यक असते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस