शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

सन्मान, प्रतिष्ठा राखण्यास सीमा ओलांडण्याची तयारी : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 5:17 AM

नागरिकांना लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन

द्रास (लडाख) : भारत आपला सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडण्यास तयार आहे, अशी गर्जना करत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सामान्य नागरिकांनी अशा स्थितीत सैनिकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन केले. रशिया-युक्रेन युद्धाचे उदाहरण देत राजनाथ सिंह म्हणाले की, हे युद्ध एका वर्षाहून अधिक काळ सुरू आहे, कारण नागरिक पुढे आले आहेत आणि युद्धात भाग घेत आहेत. 

२४ व्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील युद्ध स्मारकात सिंह बोलत होते. तत्पूर्वी, त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

राजनाथ सिंग यावेळी म्हणाले की, देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. याचा अर्थ नियंत्रण रेषा ओलांडणे असेल तर आम्ही ते करण्यासही तयार आहोत. आम्हाला चिथावणी दिली गेली आणि गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू. जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती असते तेव्हा आमच्या लोकांनी नेहमीच आमच्या जवानांना पाठिंबा दिला आहे. 

या युद्धात लढलेल्या अनेकांचे नुकतेच लग्न झाले होते, काहींचे लग्न   होणार होते  किंवा काही त्यांच्या कुटुंबाचे एकमेव कमावते होते. मात्र, त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, त्यांचे योगदान पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही सिंग यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था) 

कारगिल युद्ध भारतावर लादण्यात आले होते. ज्या वेळी भारत पाकिस्तानसोबतचे प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करत होता, त्या वेळी पाकिस्तानने आमच्या पाठीत खंजिर खुपसला.    - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह