शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

"कुठल्याही मदतीसाठी तयार', रशियानं यूक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांनंतर भारतानं दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 20:16 IST

भारताने युक्रेन युद्ध पुन्हा भडकल्याने सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. युद्धाचा निर्णय कुणाच्याही हिताचा नाही. यामुळे सर्व पक्षांनी शत्रुत्व टाळून तत्काल मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा, असे भारताने म्हटले आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांसंदर्भात भारताने प्रतिक्रिया दिली आहे. युद्ध भडकणे कुणाच्याही हिताचे नाही, असे भारताने म्हटले आहे. याच वेळी मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमाने मार्ग काढावा, असा आग्रहही भारताने  केला आहे. एवढेच नाही, तर आपण तणाव कमी करण्याच्या दृष्टीने कोणत्याही मदतीसाठी तयार आहोत, असेही भारताने म्हटले आहे.

भारताने युक्रेन युद्ध पुन्हा भडकल्याने सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. युद्धाचा निर्णय कुणाच्याही हिताचा नाही. यामुळे सर्व पक्षांनी शत्रुत्व टाळून तत्काल मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा, असे भारताने म्हटले आहे. गेल्य काही दिवसांच्या शांततेनंतर रशियाने सोमवारी युक्रेनच्या काही भागांवर मिसाइल हल्ले केल्यानंतर, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

बागची म्हणाले, ‘‘आम्ही सर्व पक्षांना तत्काळ शत्रुत्वाचा त्याग करून कूटनिती आणि संवादाच्या मार्गावर परतण्याचे आवाहन करत आहोत. तसेच, स्थिती सामान्य करण्याच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या सर्व प्रयत्नांसाठी भारत तयार आहे. युक्रेनमधील संघर्ष पुन्हा भडकल्याने भारत चिंतित आहे. कारण यात पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आणि अनेकांचा मृत्यू झाला."

रशियाने 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली - युक्रेनच्या म्हणण्यानुसार, रशियाने युक्रेनवर 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली आहेत. एजन्सी रिपोर्टनुसार, रशियन हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला, तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. रशियन हल्ल्यात लिव्ह, पोल्टावा, खार्किव, कीव या शहरांतील अनेक भाग जळून खाक झाले आहेत. या शहरांमधील इंटरनेट सेवाही बंद झाली आहे. या हल्ल्यात डझनहून अधिक गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाIndiaभारतwarयुद्ध