शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

कुलभूषण प्रकरणामुळे शरीफ सरकारकडे लष्करावर वरचढ होण्याची संधी

By admin | Published: May 11, 2017 11:38 AM

कोर्टाचा आदेश डावलून फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा पाकिस्तानची बदनामी होईल.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 11 - भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेल्या निकालामुळे पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लष्करावर वरचढ होण्याची संधी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या आदेशामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी पंचाईत झाली असून, त्यांच्यावर दबाव वाढला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी लष्कर बॅकफुटवर ढकले गेले आहे. 
 
पाकिस्तानी लष्कराने गुप्तपणे कुलभूषण जाधव यांच्यावर खटला चालवला. कुठलाही पुरावा नसताना त्यांना गुप्तहेर ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. लष्करी न्यायालयाने एकतर्फी खटला चालवताना कुलभूषण जाधव यांना कोणतीही कायदेशीर मदत मिळू दिली नाही. आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताच्या म्हणण्यात तथ्य आढळल्यानेच फाशीला स्थगिती मिळाली. 
 
कोर्टाचा आदेश डावलून फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा पाकिस्तानची बदनामी होईल. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी करण्यात तूर्तास तरी, नरेंद्र मोदी सरकारला यश आले आहे. पाकिस्तानात लोकशाही नियुक्त सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी, अंतिम निर्णय लष्कराचा चालतो. पण जाधव प्रकरणाच्या निमित्ताने शरीफ सरकारला लष्कराचा प्रभाव कमी करण्याची संधी आहे. 
 
नवाझ शरीफ यांना भारताबरोबर चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरु करायची आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निकालामुळे लष्कराला डावलून काही पावले उचलण्याची शरीफ सरकारकडे संधी आहे. कुलभूषण जाधव यांना फाशी सुनावल्यानंतर पाकिस्तानातील एकाही राजकीय पक्षाने मतप्रदर्शन केलेले नाही हे सुद्धा महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य ठरला असून, येत्या 15 मे पासून या खटल्याची सुनावणी सुरु होईल. त्यावेळी भारत सरकार अधिक सशक्तपणे कुलभूषण जाधव यांची बाजू मांडेल.