शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 07:05 IST

विदर्भ चाळिशीपार; नागपुरात उष्माघाताने ६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी दुपारी आजवरचे ऐतिहासिक ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुढे आले,  परंतु दिल्लीत एवढे तापमान अशक्य आहे. सेन्सरमधील त्रुटींमुळे विक्रमी तापमानाची नोंद झाली. दिल्लीतील सरासरी तापमान हे ४६.८ अंश सेल्सिअस इतकेच होते, असे स्पष्टीकरण भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आले.

काही दिवसांपासून दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. मंगळवारी दिल्लीच्या मुंगेशपूरमध्ये ४९.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत मुंगेशपूरमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजता ५२.९ अंश तापमानाची झाली. दिल्लीच्या पाऱ्याने राजस्थानलाही मागे टाकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त झाले. परंतु काही वेळाने हवामान विभागानेही शंका उपस्थित केली. 

देशात हरयाणाच्या रोहतकमध्ये बुधवारी सर्वाधिक ४८.८ अंश तापमान असल्याचे हवामान विभागाच्यावतीने रात्री उशिरा स्पष्ट करण्यात आले. ताेपर्यंत दिल्लीच्या विक्रमी तापमानाचीच देशभरात गरमागरम चर्चा रंगली हाेती.

३ तासांची पगारी रजा

दिल्लीतील तापमानवाढीची दखल घेत उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी भर उन्हात काम करणाऱ्या कामगारांना दुपारी १२ वाजेपासून ३ वाजेपर्यंत तीन तासांच्या पगारी रजेची घोषणा केली आहे. तसेच कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

विदर्भ चाळिशीपार; नागपुरात उष्माघाताने ६ मृत्यू

  • नवतपामुळे विदर्भात बुधवारीदेखील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा चाळिशीच्या पुढे राहिला. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 
  • विदर्भात सूर्याचा प्रकोप पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 
  • वाढत्या तापमानामुळे बुधवारी नागपुरात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. आर्द्रता काही प्रमाणात घटल्याने दमट वातावरणाची जाणीव कमी झाली; पण उन्हाच्या झळा मात्र त्रासदायक ठरल्या आहेत. 
  • दिवसासाेबत रात्रीही उष्ण लहरींचा प्रभाव वाढल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :delhiदिल्लीSummer Specialसमर स्पेशलHeat Strokeउष्माघातVidarbhaविदर्भ