शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

यावर्षी सरकारकडून अन्नधान्याची विक्रमी खरेदी, ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 11:17 IST

पंतप्रधानांनी सांगितले की, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने १९ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. याचा लाभ जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना होईल.

नवी दिल्ली : शेती आणि बागायतीमध्ये यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यानुसार, सरकारनेही किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) अन्नधान्याची विक्रमी खरेदी केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक गहू खरेदी एमएसपीवर करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभधारकांच्या खात्यामध्ये वर्ग केला. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. पंतप्रधानांनी सांगितले की, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सरकारने १९ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. याचा लाभ जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना होईल. पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिल्यांदाच लाभ देण्यात आला आहे. कोरोनासाथीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी सांगितले की, राज्य सरकारांनी औषधी आणि आवश्यक पुरवठ्याचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. कोरोना हा देशाचा अदृश्य शत्रू असून, त्याचा सामना करीत आहे. त्याच्याशी आपण युद्धपातळीवर दोन हात करीत आहोत.मोदी यांनी म्हटले की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेवर सर्व शेतकरी खुश आहेत. पंजाबातील शेतकरी विशेषत: खुश आहेत. अनेक शेतकऱ्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेले समाधानाचे व्हिडिओ मी पाहिले आहेत.सेंद्रिय शेतीचे व्यावसायिक मॉडेल विकसित करणाऱ्या मेघालयातील एका शेतकऱ्यास मोदींनी सांगितले की, देशात १० हजार ‘शेतकरी उत्पादक संघटना’ स्थापन करण्यात येत आहेत. तुमचे व्यवसाय मॉडेल तुम्ही लोकप्रिय केले आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने २०१९ साली पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. दर तीन महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो.

तुम्ही इतरांसमोर उदाहरण ठेवलेपंतप्रधानांनी योजनेच्या काही लाभार्थींशी वार्तालाप केला. बरड जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतरित करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका शेतकरी महिलेस मोदींनी सांगितले की, तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण घालून दिले आहे. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या क्षमता आणि अनुभवाबद्दल बोलतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीMarketबाजार