शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

वातावरण बदल, ऊर्जा संकटावर तोडगा काढा

By admin | Published: February 23, 2016 3:01 AM

वातावरण बदल, ऊर्जा संकट आणि जीवघेण्या आजारांवर तोडगा काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) दीक्षांत समारंभात बोलताना विद्यार्थ्यांना केले.

वाराणसी : वातावरण बदल, ऊर्जा संकट आणि जीवघेण्या आजारांवर तोडगा काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) दीक्षांत समारंभात बोलताना विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थ्यांनी केवळ कट- पेस्टवर विश्वास न ठेवता सृजनात्मक कार्य आणि संशोधनावर भर देत जगासमोरील आव्हानांना सामोरे जावे. औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतरही ग्रहणशीलता आणि नवे ज्ञान मिळविण्यासाठी उत्सुक असावे. देशातील युवक आणि महिलांसमक्ष मी आव्हान हे ठेवत आहे. जागतिक तापमान थोडे कमी करण्यासाठी मदत होईल किंवा भीषण ऊर्जा संकटावर मात करता येईल असे संशोधन त्यांनी समोर आणावे. नवीकरणाचे किंवा सातत्यपूर्ण पर्यायी स्रोत शोधले जात नसेल तर मानवतेसमोर मोठे संकट उभे ठाकले जाऊ शकते. देश आणि जगासमोरील समस्यांवर तोडगा काढण्याचे स्वप्न बघितले जावे, असे ते सोमवारी विद्यार्थी आणि बीएचयूचे शिक्षणतज्ज्ञांना संबोधित करताना म्हणाले. (वृत्तसंस्था) घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण.... बीएचयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीबद्दल घोषणा देणाऱ्या आशुतोष सिंग या विद्यार्थ्याला भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे या समारंभात काही काळ तणाव निर्माण झाला. मोदी भाषण संपवून जात असताना आशुतोषने घोषणा दिल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. मानद पदवीस नकार...1 मोदींनी सोमवारी बीएचयूची मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास नकार दिला. त्यासंबंधी प्रस्ताव मी नम्रपणे नाकारत आहे, असे त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना म्हटले. बनारस हिंदू विद्यापीठाला भेट देणे ही बाबच माझ्यासाठी अभिमानाची आहे. डॉक्टरेट प्रदान करण्याबाबत मला विद्यापीठाकडून पत्र मिळाले होते. 2 मी नम्रपणे त्याला नकार दिला. मी अशा बाबींपासून स्वत:ला दूर ठेवणे चांगले राहील, असे मला वाटते. या विद्यापीठाचे कुलपती, कुलगुरूंनी माझी त्यासाठी निवड केल्याबद्दल मी आभारी आहे, असेही मोदींनी दीक्षांत समारंभात म्हटले.