शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्ली सीमांवरील बॅरिकेड्स काढली; शेतकऱ्यांना हटवणार की तीव्र आंदोलन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 05:41 IST

Farmers agitation : बॅरिकेड‌्स हटविल्यानंतर आपल्याला इथून हटवले तर जाणार नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी अधिक गर्दी करा, अशा सूचना संयुक्त किसान मोर्चाने दिल्या आहेत.

- विकास झाडे

नवी दिल्ली : रस्ते का अडवता? असा सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांना सवाल करीत महामार्ग मोकळे करण्याची भूमिका मांडली. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवरील बॅरिकेड‌्स हटविण्याचे काम सुरू केले आहे.  बॅरिकेड‌्स हटविल्यानंतर आपल्याला इथून हटवले तर जाणार नाही ना, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी अधिक गर्दी करा, अशा सूचना संयुक्त किसान मोर्चाने दिल्या आहेत. बॅरिकेट्स हटविल्यानंतर आम्हाला आमचा शेतीमाल थेट संसदेच्या आवारात नेता येईल, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांंनी जाहीर केले.

या आंदोलनात जवळपास ५० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून पोलिसांनी या बॅरिकेट्स लावले होते. त्यानंतर २६ जानेवारीच्या हिंसाचारामुळे त्यापुढे तारांचे काटेरी कुंपणही उभारण्यात आले. विविध अडथळ्यांमुळे या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी हाेत होती. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली.

महिन्यांपासून लोक येथील वाहतूक कोंडीमुळे वैतागले होते. शेवटी हा विषय सुप्रीम कोर्टात गेला. पोलिसांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ खुला केला आहे. आदेशानुसारच कारवाई केली जात आहे. पोलिसांनी बॅरिकेट्स काढले असले तरीही, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर शेतकरी बसले आहेत. तशीच स्थिती टिकरी सीमेवर आहे. पोलीस आपले आंदोलन उधळू शकतात, म्हणून शेतकरी नेते डॉ. दर्शनपाल यांनी शेतकऱ्यांना सीमेवर येण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन