शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ब्रिटीशकालीन तीन कायदे रद्द; राष्ट्रपती मुर्मू यांनी नवीन फौजदारी कायद्याला दिली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 23:25 IST

सदर तीन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली होती.

नवी दिल्ली: ब्रिटीशांच्या काळात केलेले तीन कायदे आता कालबाह्य झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीनही नवीन फौजदारी कायदा विधेयकांना मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा विधेयक या तीन विधेयकांना कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सदर तीन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली होती. या विधेयकांना ऐतिहासिक असल्याचे सांगताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, या कायद्यांमुळे नागरिकांचे हक्क सर्वोपरि ठेवले जातील. तसेच महिला आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल.

आता राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर या तीन विधेयकांना कायदा झाला आहे. यानंतर, १८६०मध्ये बनवलेला IPC भारतीय न्याय संहिता म्हणून ओळखला जाईल. १८९८ मध्ये बनलेला CRPC भारतीय नागरी संरक्षण संहिता म्हणून ओळखला जाईल आणि १८७२ चा भारतीय पुरावा कायदा भारतीय पुरावा संहिता म्हणून ओळखला जाईल.

राजद्रोहाच्या ऐवजी आता देशद्रोह-

आयपीसीमध्ये कलम १२४ ए होते, ज्यामध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद होती. बीएनएसमध्ये राजद्रोहाच्या ऐवजी 'देशद्रोह' असे लिहिले आहे. कोणीही देशाच्या विरोधात बोलून देशाच्या हिताचे नुकसान करू शकत नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. देशद्रोहाचा आरोप करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले होते. बीएनएसमध्ये कलम १५०मध्ये 'देशद्रोह' संबंधित तरतूद करण्यात आली आहे. कलम १५० मध्ये 'भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणारे कृत्य' म्हणून त्याचा समावेश होतो. बीएनएसमध्ये असे करताना दोषी आढळल्यास ७ वर्षापासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय दंडही आकारण्यात येणार आहे.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाAmit Shahअमित शाह