शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

"ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार"; शहीद अंशुमन सिंह यांच्या पत्नीचे सासू-सासऱ्यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 10:29 AM

सुना घरातून पळून जातात असे अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते.

लखनऊ: ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार असे प्रत्युत्तर शहीद अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती हिने आपल्या सासू-सासऱ्यांना दिले आहे. राष्ट्रपती भवनात ५ जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमात आमचा मुलगा व शहीद जवान कॅप्टन अंशुमन सिंहला राष्ट्र मरणोत्तर कीर्ती चक्र देण्यात आले. त्याची पावतीही आमच्याकडे नाही. सुना घरातून पळून जातात असे अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते.

स्मृती सिंह सध्या पंजाबमध्ये आई- वडिलांकडे गेल्या आहेत. अंशुमनच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपांबाबत त्या म्हणाल्या की, मला काहीही माहिती नाही. स्मृती या बँकर असून, त्यांचे आईवडील शिक्षक आहेत.

आई म्हणते, फोटोशिवाय माझ्याकडे काही नाही

शहीद अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते की, आमच्या शहीद  पुत्राला कीर्ती चक्राच्या रुपाने खूप मोठा सन्मान मिळाला आहे. मी व स्मृती दोघांनी मिळून कीर्ती चक्राचा स्वीकार केला. पण, ते कीर्ती चक्र आमच्याकडे आमच्य नाही. आमची सून त्या सर्व गोष्टी घेऊन गेली. माझ्या मुलाच्या छायाचित्राशिवाय माझ्याकडे आता काहीही नाही.

शहीद अंशुमन सिंह यांच्या माता-पित्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपले म्हणणे त्यांच्या कानावर घातले. त्यांना मदत करण्याचे आश्वासन राहुल यांनी दिले होते.

सरकारकडून मिळाले होते ५० लाख रुपये

■ गेल्या वर्षी जुलै महिन्यात सियाचेनमध्ये आग लागल्याच्या घटनेत आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नांत अंशुमन सिंह शहीद झाले. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्या वारसदारांना ५० लाख रुपयांची मदत मिळाली होती.

■ मात्र, त्यातील ३५ लाख रुपये पत्नी स्मृती हिला मिळाले. आर्मी ग्रुप इन्शुरन्सचे पैसेही स्मृतीनेच घेतले, असा अंशुमन सिंह यांच्या मातापित्याचा दावा आहे.■ या पैशांव्यतिरिक्त भारत व राज्य सरकारकडून आणखी काही पैसे मिळाले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSiachenसियाचिन