शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून 3 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:09 IST

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण दुर्घटना झाली आहे.

नवी दिल्ली - देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या बक्सरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण दुर्घटना झाली आहे. विजेच्या तारेचा झटका लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलं जखमी आहेत. बक्सर जिल्ह्यातील इटढी भागातील नाथपूर प्राथमिक शाळेत हा अपघात झाला. ध्वजारोहण सुरू असताना लोखंडी पाईप विजेच्या तारेवर पडल्याने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे तिथे उभ्या असलेल्या चार मुलांना विजेच्या झटका लागला. यावेळी एकच आरडाओरडा झाला. 

जखमी झालेल्या मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला. तर तीन मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी नाथपूर प्राथमिक शाळेत लोखंडी पाईप उभारण्यात आला होता. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी येथील शाळेत मोठ्या संख्येने मुले पोहोचली होती. 

ध्वजारोहण सुरू असताना अचानक बाजूने जाणाऱ्या 11 हजार व्होल्टच्या हाय टेंशन वायरवर पाईप पडला. त्यानंतर त्यात करंट आला. चार मुले त्या पाईपच्या संपर्कात आली आणि करंट बसला. शुभम कुमार, परमेश्वरा, कृष्णा आणि इंद्रजित अशी या मुलांची नावे आहेत. जखमी झालेल्या मुलांना रुग्णालयात आणण्यात आले आहे. पाचवीत शिकणाऱ्या शुभम कुमार या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले असून त्यांनी रास्ता रोको केला आहे. यानंतर पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. 

गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर राजपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार विश्वनाथ राम रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमी मुलांच्या प्रकृतीची कुटुंबीयांकडून माहिती घेतली. वीज पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप काँग्रेस आमदार विश्वनाथ राम यांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनSchoolशाळाStudentविद्यार्थीBiharबिहार