शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

नरेंद्र मोदींच्या आकसापोटी काँग्रेसचे छत्र हरवलेल्या साहित्यिकांचे राजीनामे

By admin | Published: October 17, 2015 4:07 PM

साहित्यिकांचे राजीनामे हे मोदींविरोधात डाव्यांची असलेली खेळी अशी संभावना व्यंकय्या नायडू यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - दादरी हत्या प्रकरण अत्यंत निषेधार्ह असून गुन्हेगारांना कठोर शासन व्हायलाच हवं या शब्दात केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी निषेध व्यक्त केला, मात्र, साहित्यिकांचे राजीनामे हे मोदींविरोधात डाव्यांची असलेली खेळी अशी संभावना केली. आधीच्या सरकारचा वरदहस्त असलेल्या काही साहित्यिकांना नरेंद्र मोदींना मिळालेले प्रचंड बहुमत पचलेले नाही आणि वैचारीक मतभेद असलेल्या या व्यक्ती मिळेल ती संधी साधत मोदी सरकारची बदनामी करत असल्याचा आरोप व्यंकय्या नायडू यांनी सीएनएन आयबीएनशी बोलताना केला. आणिबाणी, शीख हत्याकांड, कलबुर्गींची हत्या, दाभोळकर हत्या यावेळी हे लोक कुठे होते असा सवाल करत त्या त्या वेळी काँग्रेसचे सरकार असल्याने साहित्यिक गप्प राहिल्याचा आरोप नायडूंनी केला.
त्याचप्रमाणे देशाच्या कानाकोप-यात घडणा-या प्रत्येक निषेधार्ह घटनेची दखल पंतप्रधानांनी घ्यायलाच हवी ही मागणी हास्यास्पद असल्याचेही नायडू म्हणाले.
साहित्यिकांचे राजीनामे ही वाईट घटना असल्याचे सांगताना यामुळे केवळ भाजपाचीच नाही तर देशाचीही बदनामी होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अर्थात, देशातली सर्वसामान्य जनता सूज्ञ आहे तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही चतुर आहेत, त्यांच्यावर अशा भाजपाला जाणुनबुजून लक्ष्य करून करण्यात येत असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकूल परिणाम होणार नाही अशी आशाही नायडूंनी व्यक्त केली.