शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

निवृत्त सैनिकाच्या आत्महत्येचं राजकारण, राहुल गांधींची सुटका

By admin | Published: November 02, 2016 2:21 PM

राम किशन गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिक राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्यानंतर दिल्लीमध्ये आता खडाजंगी सुरु झाली आहे. राम किशन गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुटका केली.
आज दुपारी राहुल गांधी गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेले असता त्यांना पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतले व सुटका केली. त्यानंर पुन्हा संध्याकाळी राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राहुल गांधींची काही तासानंतर सुटका करण्यात आली. याआधी गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव राम मनोहर लोहिया रुग्णालयात कोणालाही प्रवेश दिला जात नसून गरेवाल यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  
 
('वन रँक, वन पेन्शन'ची मागणी पूर्ण न झाल्याने निवृत्त सैनिकाची आत्महत्या)
 
राहुल गांधी यांना सांगूनही रुगणालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे अशी माहिती विशेष आयुक्त एम के मिना यांनी दिली आहे. तसंच कुटुंबिय राजकीय नेत्यांशी संपर्क साधून निदर्शन करण्याचा प्रयत्न करत होते, हे रुग्णालय असून आंदोलनाची जागा नाही असं एम के मिना बोलले आहेत. 
 
मनिष सिसोदिया यांच्यासोबत काही काँग्रेस नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनादेखील पोलिसांनी रुग्णालयात प्रवेश करु दिला नाही. राहुल गांधी यांनी मोदी नवा भारत तयार करत असल्याची टीका केली आहे.
 
राम किशन गरेवाल यांनी राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. भिवानी जिल्ह्यातील बुमला गावात ते राहत होते. राम किशन गरेवाल यांना वन रँक वन पेन्शनसंबंधी तक्रार करायची होती. त्यासाठी त्यांना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घ्यायची होती. मात्र त्यांची भेट घेण्यास नकार देण्यात आल्याने राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचं कळत आहे.  
 
सुबेदार राम किशन गरेवाल यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. 'त्यांनी आम्हाला फोन केला होता. वन रँक वन पेन्शनसंबंधी आमच्या मागण्या सरकार पुर्ण करु शकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं', अशी माहिती त्यांचा मुलगा राम किशन गरेवाल यांनी दिली आहे.