शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

व्यापार्‍यांच्या नकारघंटेवर उपसभापतींचा संताप

By admin | Published: April 05, 2016 10:02 PM

जळगाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्‍यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच १० हजार रुपये दंड व वाहन जप्त होईल..., अशा निर्णयांना केळी व्यापार्‍यांनी विरोध केला. हे नियम किंवा निर्णय मान्य नसतील तर व्यापार्‍यांनी आपले परवाने बाजार समितीकडे परत करावेत.. आणि व्यापार थांबवावा, असा संताप उपसभापती कैलास चौधरींनी बैठकीत केला. पण व्यापारी मानत नसल्याने संचालक व व्यापारी यांच्यातही वादंग झाला...

जळगाव- केळीचे जे भाव बोर्डावर असतील तेवढाच भाव शेतकर्‍यांना द्यावा लागेल... यापेक्षा कमी भाव दिला तर दंड होईल... केळीची मोजणी इलेक्ट्रॉनिक काट्यावर करावी लागेल... व बाजार समितीच्या परवान्याशिवाय कुणालाही व्यवसाय करता येणार नाही... तसे केल्यास जागेवरच १० हजार रुपये दंड व वाहन जप्त होईल..., अशा निर्णयांना केळी व्यापार्‍यांनी विरोध केला. हे नियम किंवा निर्णय मान्य नसतील तर व्यापार्‍यांनी आपले परवाने बाजार समितीकडे परत करावेत.. आणि व्यापार थांबवावा, असा संताप उपसभापती कैलास चौधरींनी बैठकीत केला. पण व्यापारी मानत नसल्याने संचालक व व्यापारी यांच्यातही वादंग झाला...

मंगळवारी केळीचे भाव, केळी खरेदी, बोर्डावरील भावांच्या तुलनेत कमी भाव देणे अशा मुद्द्यांवर बाजार समितीमध्ये केळी व्यापार्‍यांसोबत बैठकीचे आयोजन दुपारी करण्यात आले. बैठकीत सुमारे तासभर बैठकीत चर्चा झाली. पण अनेक निर्णयांना प्रमुख केळी व्यापार्‍यांनी विरोध केल्याने बैठकीत शाब्दीक वाद झाले. शेवटी काही व्यापार्‍यांनी नमते घेतले.
निम्मेपेक्षा अधिक संचालकांची दांडी
केळीचा मुद्दा चर्चेत आहे. शेतकर्‍यांसाठी तो संवेदनशील आहे. असे असताना बैठकीला फक्त सभापती प्रकाश नारखेडे, उपसभापती कैलास चौधरी, संचालक प्रभाकर पवार, सिंधूबाई पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. अर्थातच निम्मेपेक्षा अधिक संचालकांनी या बैठकीला दांडी मारली.

या निर्णयांना विरोध
विनापरवाना केळी खरेदी केल्यास संबंधित व्यापार्‍याला १० हजार रुपये दंड केला जाईल, केळीची खरेदी करताना मोजमाप इलेक्ट्रॉनिक काट्यावरच करावी लागेल या निर्णयांना व्यापार्‍यांनी विरोध केला. याच मुद्द्यावरून उपसभापती चौधरी व रऊफ शेठ कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला. हा निर्णय मान्य नसेल त्यांनी बैठकीत स्पष्ट करावे... आपला परवाना बाजार समितीकडे परत करून आपला व्यवसाय थांबवावा, असा संताप चौधरींनी व्यक्त केला. सभापती नारखेडे व इतर संचालकांनी हा वाद मिटविला.

बोर्डाप्रमाणे खरेदी का करीत नाही?
केळीचा भाव ६०० रुपये असला तर व्यापारी आखूड केळी, मंदी अशी कारणे सांगून २०० रुपये क्विंटलमागे कमी देतात. शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याचे काम व्यापार्‍यांनी मागील दोन वर्षे केले, असा दावा संचालकांनी केला.

कांदेबागाचे भाव जळगावहून असावेत
रावेरात कांदेबागाचे क्षेत्र मोजके आहे. जळगाव व चोपडा तालुक्यात कांदेबागाचे क्षेत्र अधिक असते. यामुळे जळगाव बाजार समितीने कांदेबागाचे भाव काढावेत, असामुद्दाउपसभापतीचौधरीयांनीलोकमतशीबोलतानामांडला.