शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एअरस्ट्राइकचा परिणाम! सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 21:21 IST

 पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राइक करून बदला घेतला होता.

नवी दिल्ली -  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअर स्ट्राइक करून बदला घेतला होता. दरम्यान, बालाकोट येथील एअर स्ट्राइकमुळे दहशतवादी कारवायांना चांगलाच आळा बसला असून, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत मोठी घट झाली असल्याचे केंद्र सरकारकडून आज लोकसभेत सांगण्यात आले. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत लोकसभेत माहिती दिली. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. तसेच एअर स्ट्राइकनंतर घुसखोरीमध्ये 43 टक्क्यांनी घट झाली आहे,'' असे त्यांनी सांगितले. एका दिवसापूर्वीच भारताच्या कारवाईमुळे धास्तावलेल्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून अफगाणिस्तानच्या सीमेमध्ये कूच केल्याचे वृत्त आले होते. जम्मू काश्मीरमधील घुसखोरीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मंगळवारी लोकसभेत  उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने हल्ला करून दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. तसेच संरक्षण दलांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत झीरो टॉलरेन्सचे धोरण अवलंबलेले आहे. एवढेच नाही केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून घुसखोरी रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतHome Ministryगृह मंत्रालयPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद