शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

महागाईचा भडका! 10 वर्षांपूर्वी 100 रुपयांना मिळणारी वस्तू आज कितीला?; पाहा किती येतो खिशावर ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:33 IST

Inflation in India : 2012 मध्ये एखादी गोष्ट आपण जर 100 रुपयांमध्ये खरेदी करत असू तर आता त्याच गोष्टीसाठी आपल्याला 170.1 रुपये खर्च करावे लागत आहेत.

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. रोजच्या वापरातील काही गोष्टींसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. भाज्या, फळं, धान्य, कपडे, साबण, शॅम्पू, पावडर यासह अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. कोरोनानंतर आता महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. एप्रिलमध्ये महागाईचा किरकोळ दर 7.79% होता. यापूर्वी 2014 मध्ये महागाईचा दर 8 टक्क्यांपेक्षा वर गेला होता. आपल्या देशात सर्वसामान्य माणसाचं महिन्याचं उत्पन्न सरासरी साडेबारा हजार आहे. 

सध्याच्या महागाईच्या काळात या 80 कोटी जनतेचं पोट भरण्यासाठी सरकारतर्फे मोफत धान्य दिलं जातं. महागाईचा दर वाढणं याचाच अर्थ कोणत्याही वस्तू किंवा सेवेची किंमत काळानुसार वाढणं. याला कोणत्याही महिना किंवा वर्षाच्या हिशेबानुसार मोजलं जातं. उदाहरणार्थ वर्षभरापूर्वी जर एखादी वस्तू 100 रुपयांना मिळत असेल आणि आता तिची किंमत 105 रुपये झाली असेल तर याचा अर्थ त्याचा वार्षिक महागाई दर 5 टक्के आहे. 

- सध्या महागाईचा दर 2012 च्या बेस प्राईसवर मोजला जातो. म्हणजेच 2012 मध्ये 100 रुपयांत जी गोष्ट आपण खरेदी करू शकत होतो तिच्यासाठी आता किती किंमत मोजावी लागते यावरून त्याचा अंदाज बांधला जातो.

- 2012 मध्ये एखादी गोष्ट आपण जर 100 रुपयांमध्ये खरेदी करत असू तर आता त्याच गोष्टीसाठी आपल्याला 170.1 रुपये खर्च करावे लागत आहेत. त्याच गोष्टीसाठी एक वर्षभरापूर्वी 157.8 रुपये मोजावे लागत होते. म्हणजेच एका वर्षात तीच गोष्ट खरेदी करण्यासाठी 12.3 रुपये जास्त मोजावे लागत आहेत.

- एका वर्षभरातच तीच गोष्ट खरेदी करण्यासाठी 157.8 रुपयांऐवजी आता 170.1 रुपये खर्च करावे लागत आहे. याचाच अर्थ महागाईचा दर 7.79% इतका झाला आहे.

भारतात महागाईचा दर मोजण्याचे दोन निर्देशांक आहेत. एक म्हणजे ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) आणि दुसरा आहे घाऊक (होलसेल) मूल्य निर्देशांक (WPI). CPI च्या माध्यमातून महागाईचा किरकोळ दर काढला जातो. तर WPI च्या माध्यमातून किरकोळ महागाई दर मोजला जातो. सर्वसामान्य ग्राहक किरकोळ बाजारातून सामान खरेदी करतात. किरकोळ बाजारातील सामान किती महाग किंवा स्वस्त झालं आहे हे CPI च्या माध्यमातून लक्षात येतं. तर मोठमोठ्या व्यावसायिक कंपन्या ठोक म्हणजेच घाऊक बाजारातून सामान खरेदी करतात. या होलसेल बाजारातील बदल WPI च्या माध्यमातून समजतात.

2012 मध्ये 100 रुपयांना मिळत होती त्या विविध गोष्टींच्या किंमती आता साधारणपणे किती झाल्या आहेत ते जाणून घेऊया...

2012 मध्ये 100 रुपयांना मिळणाऱ्या धान्यासाठी आता 152.9 रुपये मोजावे लागत आहेत. मांस आणि मच्छीची किंमत 211.8 रुपये, अंड्यासाठी 164.6 रुपये, तर दुधासाठी 163.9 द्यावे लागत आहेत.

तेलासाठी आता 199.5 रुपये, डाळींसाठी 166.2 रुपये, साखर 119.0 रुपये मोजावे लागत आहेत. फळांची किंमत आता 172.6 रुपये, भाजीची किंमत 166.3 रुपये, मसाल्यांसाठी 181.2 रुपये अशी वाढ झाली आहे. 

नॉन अल्कोहोलिक बेव्हरेजेससाठी 166.2 रुपये, पॅकबंद अन्नपदार्थ, स्नॅक्स, मिठाईची किंमत 180. 9 रुपये झाली आहे.

जेवण आणि पेय 170.8 रुपये, पान-तंबाखू 193.9 रुपये, कपडे 173.9 रुपये, बूट –चप्पल 166.2 रुपये, इंधन आणि लाईट 172.4 रुपये अशी वाढ झाली आहे. 'आजतक'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :InflationमहागाईIndiaभारत