शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

‘हिंदुत्व’ शब्दाचा घेणार फेरआढावा

By admin | Published: October 17, 2016 4:13 AM

हिंदूंची जीवनशैली ध्वनित होते या राजकीयदृष्ट्या अत्यंत कळीच्या आणि नाजूक प्रश्नाचा सर्वोच्च न्यायालय सुमारे २० वर्षांनी फेरआढावा घेणार आहे.

नवी दिल्ली : ‘हिंदुत्व’ हा शब्द हिंदू धर्माचा निदर्शक आहे की तो संस्कृतीदर्शक शब्द असून त्यातून हिंदूंची जीवनशैली ध्वनित होते या राजकीयदृष्ट्या अत्यंत कळीच्या आणि नाजूक प्रश्नाचा सर्वोच्च न्यायालय सुमारे २० वर्षांनी फेरआढावा घेणार आहे.महाराष्ट्रात शिवसेनेने राजकारणासाठी हिंदुत्वाची कांस सर्वप्रथम धरली. १९८०च्या दशकाच्या मध्यात नव्या रूपाने स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेशी युती केली आणि याचा लाभ घेत ही युती १९९५ मध्ये राज्यात सत्तेवर आली. भाजपानेही या हिंदुत्ववादी राजकारणाचा पुरेपूर लाभ करून घेत ‘विपक्ष’ ते ‘विकल्प’ अशी राष्ट्रीय पातळीवर मजल मारली.न्यायालयाच्या पातळीवर हिंदुत्वाची पहिली तपासणी विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडीच्या निमित्ताने झाली. काँग्रेसचे प्रभाकर कुंटे यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रभूंची निवडणूक हिंदुत्वाच्या नावावर मते मागितल्याच्या कारणावरून रद्द केली. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मतदार म्हणून सहा वर्षे अपात्र ठरविले गेले. पुढे मनोहर जोशी यांच्या लोकसभा निवडणुकीलाही याच मुद्द्यावर यशस्वी आव्हान दिले गेले. प्रभू, ठाकरे व जोशी यांच्या अपिलांच्या निमित्ताने १९९५ मध्ये हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा तत्कालिन सरन्यायाधीश न्या. जे. एस. वर्मा यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असा निकाल दिला की, हिंदुत्व हा शब्द हिंदू धर्म किंवा हिंदू धर्मावलंबी यांच्याच संदर्भात वापरला जातो, असे नाही. भारतीय संस्कृती आणि येथील लोकांची जीवनशैली यांच्यासाठीही हा शब्द वापरला जाऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारी भाषणांमध्ये हिंदुत्वाची भाषा वापरली गेली म्हणून हिंदू धर्माच्या नावाने मते मागितली अथवा हिंदू उमेदवारासाठी मते मागितली असाच अर्थ काढता येणार नाही. भाषणाच्या संदर्भानुसार या शब्दांचा अर्थ घ्यायला हवा.ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने त्यावेळी हा निकाल दिला होता. त्यानंतर हिंदुत्वावरून भारतीय राजकारण आमुलाग्र ढवळून निघाले. भाजपाने आपल्यावर होणारी सांप्रदायिकतेची टीका खोडून काढण्यासाठी आपल्या निवडणूक जाहिरनाम्यांमध्येही न्यायालयाच्या या निकालाचे हवाले दिले.आता सर्वोच्च न्यायालय त्यांच्यापुढे आलेल्या ताज्या प्रकरणांच्या अनुषंगाने २० वर्षांपूर्वीच्या आपल्या या निकालांचा फेरआढावा घेणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांचे पूर्णपीठ मंगळवार १८ आॅक्टोबरपासून या विषयी सुनावणी करेल. स्वत: न्या. ठाकूर जानेवारीत निवृत्त होत असल्याने ‘हिंदुत्वा’ची न्यायालयाने आधी केलेली व्याख्या टिकते की बदलते याचा निकालही त्याआधी होईल. मूळ निकालाप्रमाणेच हा नवा निकालही देशाच्या राजकारणाच्या दृष्टिने तेवढाच महत्वाचा ठरेल, यात शंका नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)