शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

‘ओखी’चा धोका टळला, आतापर्यंत ३९ बळी; १६७ मच्छीमार बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 05:07 IST

ओखी चक्रीवादळात तामिळनाडू आणि केरळातील ३९ जणांचा मृत्यू झाला असून १६७ मच्छीमार बेपत्ता आहेत. वेंगुर्ले बंदरात उभ्या केलेल्या सात होड्या समुद्रात बुडाल्या.

नवी दिल्ली/मुंबई : ओखी चक्रीवादळात तामिळनाडू आणि केरळातील ३९ जणांचा मृत्यू झाला असून १६७ मच्छीमार बेपत्ता आहेत. वेंगुर्ले बंदरात उभ्या केलेल्या सात होड्या समुद्रात बुडाल्या. या वादळाचा प्रभाव कमी झाला असून ते गुजरातकडे सरकले असल्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा धोका टळला आहे.मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी पावसाच्या सरी कोसळल्या. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाºयावर बुधवारी ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.बचाव पथकाने ५५६ मच्छीमारांना वाचविले आहे. तामिळनाडू व केरळचे बोटींसह वाहून गेलेले ८०९ मच्छीमार किनाºयावर पोहोचले. लक्षद्वीपमधील ३३ पर्यटक सुरक्षित आहेत. चक्रीवादळाने गुजरात, दमण, दीव व दादरा नगर हवेली येथे मोठ्या नुकसानाची शक्यता आहे.लक्षद्वीपमध्ये मदतओखीमुळे प्रभावित झालेल्या लक्षद्वीपमधील नागरिकांना भारतीय नौदलाने मदतीचा हात दिला. नौदलाने जहाजातून जीवनावश्यक साहित्य कवारट्टी आणि कल्पनी बेटावरील नागरिकांना पोहोचविले.राज्यातील शेतकरी चिंतेतओखी वादळामुळे राज्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटीसह वर्सोवा चौपाटीवर उसळलेल्या समुद्राच्या लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती. मात्र मुंबईपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या ओखी वादळाने दक्षिण गुजरातकडे आगेकूच केल्याने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला.पूर्वमध्य अरबी समुद्रावर आलेले ओखी चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले तरी पावसामुळे समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे शक्यतो समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.अफवांचाही पाऊस!आज दिवसभर अफवांचा पाऊसहीजोरदार होता. चक्रीवादळामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गारा पडल्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता, तर मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतू (सी-लिंक) आणि पेडर रोड खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवल्याची अफवा मंगळवारी व्हायरल झाली होती.नेत्यांच्या सभा रद्द : चक्रीवादळ सुरतपासून ३९० किमी अंतरावर असून वादळामुळे गुजरातमध्ये अनेक नेत्यांच्या प्रचारसभा रद्द झाल्या आहेत.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ