शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

केदारनाथसाठी लवकरच रस्ता, रेल्वे अन् रोप-वे होणार; पुष्कर धामी यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 7:47 AM

उत्तराखंडात भाजपचे सरकार दुसऱ्यांदा स्थापन करण्यात यशस्वी ठरलेल्या पुष्कर धामी यांच्याशी लोकमतचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांची बातचीत..

विशेष मुलाखत- पुष्कर धामी, मुख्यमंत्री उत्तराखंड

निवडणुकीच्या आधी पहिली चार वर्षे उत्तराखंडात भाजप ढिला पडला होता. आपण जादूची अशी कोणती कांडी फिरवलीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने केवळ भारताचेच नव्हे तर जगातले सर्वात प्रभावी नेतृत्व आमच्याकडे आहे. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली राज्यात पुष्कळ कामे झाली. ज्यामुळे आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळाला, बहुमत मिळाले. रस्त्यांमुळे गावे जोडली गेली. रेल्वे आणि विमान सेवेने देशाच्या कानाकोपऱ्यात उत्तराखंडातून जाता येऊ लागले. 

आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले काही निर्णय आपण परत घेतले. आपल्या विजयाचे हे कारण मानावे काय?

काही कर्मचारी संघटना नाराज होत्या. त्यांच्याशी बोलून मधला रस्ता काढला गेला. देवस्थानम बोर्डाच्या बाबतीत समिती स्थापन केली गेली होती. त्या समितीने भाविक पंडा समाज, रावल आदींकडून मते घेऊन आपला अहवाल तयार केला होता. त्या अहवालाच्या आधारे बोर्ड भंग केले गेले. लोकांच्या भावनांना अनुरूप जे निर्णय घेणे जरुर होते ते घेतले गेले.

- पण आपण आपल्या मतदार संघात पराभूत झालात, स्वकीयांनी काही घातपात केला का? नाही. नाही. सर्वांचे सहकार्य मिळाले. कुठे काही कमी राहून गेले असेल तर ते दूर करू.

आपल्यासाठी दोन काँग्रेस आमदारांनी जागा रिकामी करून दिली हे कसे जमवले? 

आमच्या पक्षातले लोक, सहकारी पक्ष आणि काही अपक्षांनीही जागा सोडायची तयारी दर्शवली होती.  मी सर्वांचा आभारी आहे. मी चंपावत मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. ती देवभूमी आहे. येथे माँ पूर्णागिरीचे निवासस्थान आहे. शारदा मैयाचा किनारा आहे. बाबा गोरखनाथ, माँ वाराही, रंकूची मैय्या यांचे स्थान आहे. माँ हिंग्लाज देवीचे स्थान आहे. घटोत्कचाचे स्थान आहे. या सर्वांच्या आशीर्वादाने यावेळी मला जनतेचाही आशीर्वाद मिळेल, अशी आशा मी करतो. 

आपल्या पहिल्या कार्यकाळापेक्षा यावेळी वेगळे काय करणार आहात? 

पहिल्या कार्यकाळात मला खूप कमी वेळ मिळाला. कामे पुष्कळ होती. निवडणूक डोक्यावर होती. सर्वांच्या सहकार्याने आम्ही दोन तृतीयांश बहुमत मिळवले. आता आम्ही समान नागरिक संहितेचा कायदा करणारे देशाचे पहिले राज्य होण्याच्या दिशेने प्रयत्न करू. विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन केली गेली आहे. लवकरच ते विधानसभेत संमत करून घेतले जाईल. 

केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेसाठी यावेळी कशी व्यवस्था करणार आहात? 

कोरोनामुळे दोन वर्षांनंतर चारधाम यात्रा सुरू होत आहे. स्वाभाविकच भाविक अधिक संख्येने येत आहेत. पहिल्या वर्षाच्या तुलनेने कित्येक पटीने अधिक. या यात्रेचे चांगले व्यवस्थापन आमच्यासाठी एक आव्हानच असून, आम्ही ते निभावण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहोत. परंतु, यात्रेच्या काळात पर्यटकांचे मृत्यू होत असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रत्येक वर्षी प्राकृतिक कारणांनी अनेक भाविक मृत्युमुखी पडतात. यावर्षी भाविकांची संख्या अधिक असल्याने मृत्यूची संख्या ही जास्त वाटणारच. वास्तवात ती जास्त नाही. 

इतक्या संख्येने पर्यटक आल्यानंतर पर्यावरणाचे काय? 

उत्तराखंडाची अर्थव्यवस्था पर्यटकांवर अवलंबून आहे. परंतु आमच्यासाठी इकॉनॉमी इतकीच इकॉलॉजीही महत्त्वाची आहे. आम्ही दोन्हींचा समतोल राखत आहोत. 

बद्री आणि केदारनाथला जाण्यासाठी अधिक चांगला रस्ता आणि रेल्वे सेवा कधीपर्यंत निर्माण केली जाईल? 

काही कायदेशीर अडचणींमुळे रस्त्याचे कामकाज थोडे  थांबले. सर्व प्रकारच्या हवामानात चालू शकेल, असा रस्ता लवकरच तयार होईल.केदारनाथसाठी रेल्वे सेवा काही वर्षांतच सुरू होईल. जवळपास त्याच वेळी केदारनाथसाठी रोप-वेही चालू होऊ शकेल.

टॅग्स :Kedarnathकेदारनाथroad transportरस्ते वाहतूक