शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केरळमध्ये प्लॅस्टिक कचऱ्याद्वारे रस्तेबांधणी; शुचित्व सागरम योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 04:30 IST

समुद्रातील प्लॅस्टिक कच-याचा निचरा करणे वा त्याची विल्हेवाट लावणे ही मोठ्या शहरांची समस्या बनली असताना, केरळ सरकारने या कच-याचा वापर रस्तेबांधणीसाठी करण्यास सुरुवात केली आहे.

तिरुवनंतपूरम : समुद्रातील प्लॅस्टिक कच-याचा निचरा करणे वा त्याची विल्हेवाट लावणे ही मोठ्या शहरांची समस्या बनली असताना, केरळ सरकारने या कच-याचा वापर रस्तेबांधणीसाठी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी केरळ सरकारने विशेष योजनाच आखली आहे.महाराष्ट्रात मुंबईसह कोकणातील समुद्रात व किनाºयावर प्रचंड प्लॅस्टिक कचरा कायम पडलेला असतो. समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाºया मासेमारांच्या जाळ्यात हे प्लॅस्टिक अडकते आणि त्यामुळे जाळ्याही फाटतात, तसेच या प्लॅस्टिकमुळे मासेही मोठ्या प्रमाणात मरतात, असे आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही रस्तेबांधणीसाठी या प्लॅस्टिकचा वापर करण्याचामानस बोलून दाखविला होता,पण केरळने त्यासाठी योजनाचतयार केली आहे.साधारणपणे १ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी १० लाख प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. आपण सध्या इतका प्लॅस्टिकचा वापर करीत आहोतकी, इतके प्लॅस्टिक सहजच उपलब्ध होत आहे.शिवाय डांबराच्या रस्त्यांपेक्षा प्लॅस्टिक वापरून रस्तेबांधणीसाठी साधारणपणे ८ टक्के कमी खर्च येतो. एका अंदाजानुसार प्रत्येक भारतीय वर्षाला सुमारे ११ किलो प्लॅस्टिक वापरतो आणि फेकतो. भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे, हे लक्षात घेता, रस्त्यांसाठी भरपूर प्लॅस्टिक मिळू शकेल. (वृत्तसंस्था)शुचित्व सागरम (समुद्र स्वच्छ करणे) असे या योजनेचे नाव आहे. केरळच्या मत्स्यसंवर्धनमंत्री जे. मर्सीकुट्टी अम्मा यांनी सांगितले की, मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या प्लॅस्टिकचे वर्गीकरण केले जाईल. त्या प्लॅस्टिकचे अतिशय बारीक तुकडे केले जातील आणि त्यांचा वापर रस्तेबांधणीसाठी केला जाईल. अस्फाल्टला पर्याय म्हणून या प्लॅस्टिकचा वापर करणे सहज शक्य आहे.मर्सीकुट्टी अम्मा यांनी हेही स्पष्ट केले की,ही योजना प्रत्यक्ष राबविणेही आम्ही सुरू केले आहे. कचºयाचे वर्गीकरण करणे व त्याचे बारीक तुकडे करणे या कामांमुळे अनेकांना रोजगारही मिळाला आहे. डांबर ५0 अंश सेल्शिअस तापमानाला वितळू लागते, पण प्लॅस्टिक वितळण्यासाठी मात्र ६५ अंश तापमानाची गरज असते. म्हणजेच ते डांबराप्रमाणे लवकर वितळत नाही आणि त्यामुळे रस्ते अधिक काळ टिकतात.अर्थात मुळात समुद्रातील प्लॅस्टिक संपविणे, हा यामागील हेतू आहे. केरळला प्रचंड समुद्र व किनारा लाभलेला आहे. त्यामुळे शुचित्व सागरम योजनेद्वारे आम्ही कमी खर्चात मोठ्या प्रमाणात रस्तेबांधणी करू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.राज्यातही हे व्हावे सुरूमहाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. ती पूर्ण यशस्वी होते का, हे कळण्यास अवधी लागेल. तरीही समुद्रातील प्लॅस्टिकची समस्या राज्यातही आहे. रस्तेबांधणी प्रत्यक्ष सुरू झाली, तर चांगले रस्ते बांधले जातील व खर्चही कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :keralकेरळ