शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : दलित विरुध्द दलितेतर संघर्ष नाही - स्मृती इराणी

By admin | Published: January 20, 2016 4:52 PM

हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे पण हा दलित विरुध्द सवर्ण असा संघर्ष नाही.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरु आहे पण हा दलित विरुध्द दलितेतर असा संघर्ष नाही असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी दुपारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले. 
रोहित वेमुलाच्या मृत्यूसाठी विरोधक केंद्र सरकारला जबाबदार ठरवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन आपली बाजू मांडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यावर हल्ला केल्या प्रकरणी रोहित आणि अन्य चार विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. 
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या उपसमितीच्या शिफारसीवरुन ही कारवाई करण्यात आली होती. या पाचविद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या वर्गाला उपस्थित रहाण्याव्यतिरिक्त वसतिगृहात येण्यावर बंदी घालण्यात आली होती असे इराणी यांनी सांगितले. काही जण या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा दलित विरुध्द दलितेतर असा संघर्ष नसल्याचे त्यांनी सांगितले. 
रोहितने लिहीलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये कुठल्याही संघटनेचे नाव घेतलेले नाही फक्त शेवटी आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे नाव घेतले आहे. राजकीय अपरिहार्यतेमुळे राजकीय पक्षांना विद्यापीठामध्ये जावे लागत आहे असे इराणी म्हणाल्या. 
रोहित वेमुलाच्या आत्महत्येसाठी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला जबाबदार धरण्यात आले असून, स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. बंडारु दत्तात्रय यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 
 
स्मृती इराणी यांच्या पत्रकारपरिषदेतील मुद्दे 
काँग्रेस खासराद हनुमंत राव यांच्या चिठ्ठीनुसार हैदराबाद विद्यापीठात मागच्या चारवर्षांपासून समस्या होत्या, काँग्रेसने त्यावेळी लक्ष घालून समस्या सोडवल्या असत्या तर, रोहित वेमुला आज जिवंत असता.
काँग्रेस खासदार हनुमंत राव यांनी हैदराबाद विद्यापीठाचा मुद्दा उपस्थित केला होता, रोहितने लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये बंडारु दत्तात्रय यांचे नाव नाही.
 हैदराबाद विद्यापीठाची कार्यकारी परिषद या सरकारने नेमलेली नाही, मागच्या सरकारने या परिषदेवरील प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये कुठल्याही खासदाराचे, विद्यापीठाच्या अधिका-याचे आणि संस्थेचे नाव नाही. 
वसतिगृहातून विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते, या निलंबनाला विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, उच्च न्यायालयाने आदेशाला स्थगिती द्यायला नकार दिला होता.
रोहित वेमुला मृत्यू प्रकरणात तथ्य चुकीच्या पध्दतीने सादर केली.
रोहित वेमुलाचा मृत्यू हा दलित विरुध्द अन्य असा संघर्ष नाही, विद्यार्थ्यांच्या एका गटाने दुस-या विद्यार्थ्यावर हल्ला केला होता.
रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर मी माझ्या दु:खद भावना व्यक्त केल्या.