शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

रोहितचे शतक पुन्हा वाया, दुस-या सामन्यातही ऑस्ट्रेलिया विजयी

By admin | Published: January 15, 2016 8:46 AM

बेली, फिंच आणि मार्शच्या संयमी खेळीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारतावर ७ गडी राखून विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

ब्रिस्बेन, दि. १५ -  बेली (नाबाद ७६), फिंच (७१) आणि मार्श (७१) यांच्या संयमी खेळीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारतावर ७ गडी राखून विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली आहे. या पराभवामुळे सुलग दुस-यांदा रोहित शर्माची शतकी खेळी वाया गेली. 
ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत ३ गडी गमावून भारताच्या ३०९ धावांचे आव्हान सहज पार केले. भारतातर्फे शर्मा, यादव आणि जडेजाने प्रत्येकी १ बळी टिपला. १२४ धावांची खेळी करत सलग दुस-यांदा शतक ठोकणा-या रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात 'मॅन ऑफ दि मॅच'चा खिताब देण्यात आला. सलामीवीर रोहित शर्माचे शतक(१२४) आणि अजिंक्य रहाणेची (८९) शानदार खेळी यामुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने ५० षटकांत ८ गडी गमावून ३०८ धावा केल्या. 
' सध्याच्या स्थितीत आमच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता, फलंदाजांनी आणखी मेहनत घेऊन प्रतिस्पर्धी संघासमोर सुमारे ३३० धावांचे आव्हान ठेवले पाहिजे', असे मत कर्णधार महेंद्रसिग धोनीने या पराभवाचे विश्लेषण करताना मांडले. ' आम्ही आमच्या परीने सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात शेवटी तुमचा परफॉर्मन्स महत्वाचा ठरतो. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खरच उत्तम कामगिरी केली' असेही धोनी म्हणाला.
 
भारताने धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा मात्र शिखर धवन लवकर बाद झाल्याने ९ धावांवर असताना संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या (५९) साथीने डाव सावरला, त्यांनी दुस-या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. मात्र संघाची धावसंख्या १३४ असताना विराट बाद झाल्याने त्यांची जोडी फुटली. त्यानंतर रोहित शतक ठोठावत भारताला २५० चा टप्पा गाठून दिला तर अजिंक्यनेही ८० चेंडूत ८९ धावा फटकावल्या. 
मात्र धोनी(११), मनिष पांडे (६), जडेजा (५) आणि अश्विन (१) हे खेळाडू अपयशी ठरले. उमेश यादव (०) नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियातर्फे फॉकनरने २, तर  हॅस्टिंग्ज,  पॅरिस व बोलँडने प्रत्येकी १ बळी टिपला. ३ खेळाडू धावबाद झाले.
भारताने आपल्या संघात एक बदल करत भुवनेश्वर कुमारच्या जागी इशांत शर्माला स्थान दिले. 
ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि डेव्हीड वॉर्नरला विश्रांती देऊन त्यांच्या जागी शॉन मार्श, जॉन हॅजटींग आणि केन रिचर्डसनला संघात स्थान दिले आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३०९ धावांचा डोंगर रचूनही भारताला ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखता आले नव्हते. 
सलमीवीर रोहित शर्माची  (१७१) धावांची खेळी वाया गेली होती.