शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
3
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
4
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
5
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
6
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
7
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
8
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
9
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
10
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
11
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
12
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

रालोद की मूंछ, या भाजपा की पूंछ!

By admin | Published: February 17, 2017 12:49 AM

‘रालोद की मूंछ बनोगे... या भाजपा की पूंछ बनोगे?’ हे घोषणा आहे, अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाची. जाट मतदारांचा प्रभाव

सुरेश भटेवरा / हरदोई‘रालोद की मूंछ बनोगे... या भाजपा की पूंछ बनोगे?’ हे घोषणा आहे, अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाची. जाट मतदारांचा प्रभाव असलेले अनेक मतदारसंघ पश्चिमी उत्तर प्रदेशात आहेत मात्र समाजवादी आणि काँग्रेसच्या आघाडीत शिरण्याची संधी न मिळाल्यामुळे अजितसिंगांनी राज्यभरात ३00 हून अधिक उमेदवार उभे केले आहेत.लोकसभा निवडणुकीत बहुतांश जाट समाज मोदींच्या पाठिशी उभा राहिला. त्याचा फायदा झाला. आता जाटांनी भाजपाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जाटांचे नेते यशपाल मलिक म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी आणि भाजपाने विश्वासघात केला. लोकसभेवेळी दिलेले आरक्षणापासून मुजफ्फरपूर दंगलीतल्या दोषींना शिक्षा करण्यापर्यंतचे एकही आश्वासन पूर्ण केले नाही. हरयाणा हेही जाटांची बहुसंख्या असलेले राज्य. तिथेही जाट नेत्याला मुख्यमंत्री केले नाही. निवडणुकीच्या तोंडावर जाट महासभेने भाजपाला जाब विचारण्यास रॅलीचे आयोजन केले, तेव्हा पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह सारेच नेते जागे झाले. पण जाटांची समजूत घालण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना यश आले नाही. भाजपाकडून मुखभंग झाल्यामुळे जाट अस्मितेचे अंगार प्रज्वलित झालेत. भाजपाने कैरानातील हिंदुंचे पलायन आणि लव्ह जिहादसारखे मुद्दे तापवले. मात्र त्यातली हवा निघून गेली आहे. मुजफ्फरपूरच्या दंगलीची धग मात्र कायम असल्याने मुस्लीम हितरक्षणाचा झेंडा फडकावणाऱ्या समाजवादी पक्षालाही जाट जवळ करणार नाहीत. मग ही मते कोणाला मिळणार? जाट मतदानाचा आजवरचा पॅटर्न लक्षात घेता ते एकदा अजितसिंगांना मतदान करतात आणि पुढल्या निवडणुकीत रालोदला अंगठा दाखवतात. आता अजितसिंगांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दंगलीचा आरोप असलेले भाजपा आमदार संगीत सोम व सुरेश राणा यांच्या विरोधात रालोदने मुस्लीम तर सपाने जाट उमेदवार उतरवल्याने ते अडचणीत आहेत.