शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

Mohan Bhagwat: “हिंदूंना सुसंघटित करणे हेच RSSचे खरे ध्येय”; मोहन भागवतांचे रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 5:04 PM

RSSचे दूरून नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग घेऊन निरीक्षणाने विश्लेषण करावे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.

शिलाँग: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही केवळ संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणारी एखादी संघटना नसून हिंदू समाजाला सुसंघटित करणे हेच खरे तिचे ध्येय आहे. भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, ते साध्य करण्यासाठी स्वयंसेवक शाखा कार्यपद्धतीतून काही शिस्त शिकतात, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. मेघालयची राजधानी शिलाँग येथील यू सोसो थाम सभागृहात जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

आपण अनादी काळापासून एक प्राचीन राष्ट्र आहोत परंतु आपली सभ्यता आणि मूल्ये विसरल्यामुळे आपण आपले स्वातंत्र्य गमावले. आमची एकमेकांमधील बंधुत्वाची शक्ती ही अध्यात्मात निहित असलेली आमच्या जुन्या मूल्यावरील आमची जन्मजात श्रद्धा आहे. या देशाच्या शाश्वत सभ्यतेच्या मूल्यांना आपल्या देशाबाहेरील लोकांनी हिंदुत्व असे नाव दिले होते.  आम्ही हिंदू आहोत पण हिंदूची कोणतीही विशिष्ट व्याख्या नाही जरी ती आमची ओळख असली तरीही.  भारतीय आणि हिंदू हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द आहेत. खरं तर ती भौगोलिक-सांस्कृतिक ओळख आहे याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.

संघ स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून देशासाठी त्याग करायला शिकवतो

संघ स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून देशासाठी त्याग करायला शिकवतो.  एका तासाच्या संघशाखांमध्ये लोकांना ही परोपकारी मूल्ये आणि मातृभूमीबद्दलचे कर्तव्य कळते असे डॉ भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशाच्या प्राचीन इतिहासातून बलिदानाची ही परंपरा रेखाटली आहे.  आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या होत्या आणि जपान, कोरिया, इंडोनेशिया आणि इतर अनेक देशांमध्ये आपल्या समान मूल्यांचा ठसा उमटवला होता.  तीच परंपरा आजही आपण पाळत आहोत.  डॉ. भागवत यांनी कोरोना संकटाच्या वेळी भारताने विविध देशांमध्ये लस पाठवून मानवतेची सेवा कशी केली याची उदाहरणे दिली आणि काही काळापूर्वी आपला देश श्रीलंकेच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभा होता याचेही स्मरण करून दिले.

राष्ट्रीयत्व व स्वयंसेवकत्व या प्रमुख गोष्टी

सरसंघचालकांनी १९२५ पासून आजतागायत पाच पिढ्यांपासून समर्पित स्वयंसेवकांच्या मदतीने संघ कसा राष्ट्रीय पुनर्निर्माण कार्य करत आहे यावर भर दिला. ते पुढे म्हणाले की संघ ही केवळ संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणारी एखादी संघटना नसून हिंदू समाजाला सुसंघटित करणे हेच खरे तिचे ध्येय आहे. संघाचा सगळा भर ही रोजच्या सरावाने चांगल्या सवयी स्वतःत खोल रुजवण्यावर आहे. ज्या तीन गोष्टींवर भर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यात राष्ट्रीयत्व व स्वयंसेवकत्व या प्रमुख आहेत, असे नमूद केले. 

दरम्यान, जर भारत हे राष्ट्र सामर्थ्यवान आणि समृद्ध झाले तर प्रत्येक भारतीयही सामर्थ्यवान आणि समृद्ध होईल.  डॉ भागवत यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील श्रोत्यांना रा. स्व. संघाचे दूरून नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग घेऊन निरीक्षणाने विश्लेषण करण्यास सांगितले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ