शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

“भगव्या दहशतवादाच्या नावावर मला अडकवण्यासाठी UPA सरकारने ४०० कोटी खर्च केले”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 12:56 IST

मला अडकवण्यासाठी यूपीए सरकारने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती, असा दावा इंद्रेश कुमार यांनी केला आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) सातत्याने विरोधकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. भगव्या दहशतवादाच्या नावाखाली मला अडकवण्यासाठी UPA सरकारने तब्बल ४०० कोटी रुपये खर्च केले, असा मोठा दावा इंद्रेश कुमार यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना इंद्रेश कुमार यांनी सदर दावा केला आहे. 

जाती आणि धर्माला दहशतवादाशी जोडणे चुकीचे आहे. असे करता कामा नये. कारण दहशतवादाला प्रोत्साहन देणारे केवळ आपल्या फायद्यासाठी धर्माच्या नावावर शोषण करतात. यावर नियंत्रण ठेवायला हवे. तसेच यासंदर्भात सशक्त कायदाही तयार करायला हवा. याशिवाय धर्म आणि जातीच्या नावाखाली होणारे शोषणही थांबवायला हवे. यातील दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. 

UPA सरकारने ४०० कोटी खर्च केले

यूपीए सरकारने भगव्या दहशतवादाच्या नावाखाली मला अडकवण्याचे खूप प्रयत्न केले. यासाठी ४०० कोटी रुपये खर्च केले. पूर्ण यंत्रणा कामाला लावली. मात्र, आरोपींच्या यादीत माझे नाव घालण्यात त्यांना यश आले नाही. अखेर जनतेनेच यूपीए सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला आणि भाजपला मोठा पाठिंबा दर्शवला, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. तसेच माझे नाव साक्षीदारांच्या यादीतही समाविष्ट करण्यात आले नव्हते. मात्र, या प्रकरणात मी सामील असल्याचा मोठा गवगवा करण्यात आला होता, असा आरोप करत चुकीच्या आणि खोट्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला हवा. यासाठी मागे हटू नये. सत्याच्या मागे प्रामाणिकपणे उभे राहायला हवे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले.

दरम्यान, यापूर्वी जम्मू-काश्मीरविषयी बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले होते की, पाकिस्तान जर म्हणत असेल की काश्मीरशिवाय तो अपूर्ण आहे. तर मग लाहोर आणि कराचीशिवाय भारत अपूर्ण आहे, असे आता म्हणायला हवे, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले होते. चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणावर टीका करत निषेध केला. तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, याचा पुनरुच्चारही इंद्रेश कुमार यांनी केला होता. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ