शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 08:30 IST

अरविंद केजरीवाल यांच्या भगव्याविषयीच्या भूमिकेवर भाजपने लक्ष ठेवण्याची आवश्यकता 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर सुरू  भारतीय जनता पक्षात सुरू असलेली समीक्षा अद्याप सुरूच आहे. आता दिल्लीतील पराभवावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला इशारा दिला आहे. प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच विजय मिळवून देऊ शकत नसल्याचे आरएसएसने म्हटले आहे. 

आरएसएसचे इंग्रजी मुखपत्र 'ऑर्गनायझर' मध्ये दीनदयाल उपाध्याय यांना कोट करताना दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची समीक्षा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपचे संघटन आणि उमेदवारांविषयी विस्तारीत अवलोकन करण्यात आले आहे.

प्रत्येकवेळी मोदी-शाह भाजपला विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यासाठी संघटनेची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. संघटनेच्या स्थरावर भाजपने हे समजून घ्यायला हवं की, मोदी आणि शाह विधानसभा स्तरावरील निवडणुकीत नेहमीच मदत करू शकत नाही. स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्लीत संघटनेचे पुनर्गठन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे आरएसएसने म्हटले आहे. 

दरम्यान 2015 नंतर भाजपची स्थानिक पातळीवर असलेली यंत्रणा उर्जित अवस्थेत आणण्यात आणि निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचार आणि प्रसाराला जोर आणण्यात सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे पराभवाला समोरे जावे लागत असल्याचे दिल्ली डायवर्जेंट मेंजेट या लेखात म्हटले आहे.  यामध्ये पुढे लिहिले की, शाहीन बागविषयीचा भाजपचा नेरटीव्ह यशस्वी झाला नाही. तर अरविंद केजरीवाल यावर स्पष्ट होते. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या भगव्याविषयीच्या भूमिकेवर भाजपने लक्ष ठेवण्याची आवश्यकता 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केली आहे.