शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

बजेटच्या तारखेवरून सत्ताधारी-विरोधकात संघर्ष

By admin | Published: January 05, 2017 2:56 AM

नोटाबंदीनंतर सरकार आणि विरोधकात झालेल्या मोठ्या संघर्षानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने येत आहेत.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीनोटाबंदीनंतर सरकार आणि विरोधकात झालेल्या मोठ्या संघर्षानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने येत आहेत. निमित्त आहे १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पाचे. पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तूर्तास अर्थसंकल्प सादर करु नये, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर, सरकार आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणी राष्ट्रपतींकडे दाद मागितली असली तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती यात हस्तक्षेप करणार नाहीत. ते संसदेचे अधिवेशन बोलवू शकतात. कॅबिनेटने केलेल्या शिफारशीनुसार ३१ जानेवारीच्या नियोजित अधिवेशनात राष्ट्रपती काही फेरबदल करतात का ते स्पष्ट झालेले नाही. पण, राष्ट्रपती भवनातील सूत्र असे सांगतात की, राष्ट्रपती यात हस्तक्षेप करण्याची शक्यता कमी आहे. पण, मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम जैदी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे की, पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर करता येईल का? याची पडताळणी करण्यात येईल. दरम्यान, डॉ. जैदी आणि अन्य दोन आयुक्त ए. के. ज्योती व ओ. पी. रावत हे या प्रकरणात केंद्र सरकारला स्पष्टीकरण मागण्यापूर्वी आपसात चर्चा करणार आहेत. अशा प्रकरणात निवडणूक आयोगांतर्गत सहमतीने निर्णय घेतला जातो. पण, मतदानाची वेळ आली तरी सरकारची बाजू प्रबळ आहे. ज्योती आणि रावत यांची मोदी सरकारच्या काळात नियुक्ती झालेली आहे. तर, जैदी हे जुलै २०१७ मध्ये निवृत्त होत आहेत. विरोधकांना एकत्र येण्यासाठी यानिमित्ताने आणखी एक मुद्दा मिळाला आहे. काँग्रेसचे आनंद शर्मा, सपाचे नरेश अग्रवाल, जदयूचे शरद यादव, माकप, आप आणि अन्य पक्षांनी असा आरोप केला आहे की, सरकारने अर्थसंकल्पाची तारीख जाहीर करण्यापूर्वी आमच्याशी विचारविमर्श केला नाही. विरोधकांनी असाही तर्क केला आहे की, यूपीए सरकारने विधानसभा निवडणुकांमुळे २०१२ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ दिवसांसाठी स्थगित केले होते. सशक्त लोकशाहीसाठी अर्थसंकल्प तूर्तास टाळण्यात यावा, ही भाजपची मागणी त्यावेळी मान्य करण्यात आली होती. भाजपने याबाबत म्हटले आहे की, दर वर्षी आणि कधी सहा महिन्यालाही निवडणुका होत असतात. तर, पाच महिन्यांपूर्वीच सरकारने हे स्पष्ट केले होते की, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. तथापि, रेल्वे अर्थसंकल्प आता वेगळा राहणार नसून एकच अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. त्यानंतर एकाही पक्षाने सरकारशी संपर्क केला नाही. सरकारने देशाच्या हितासाठीच अर्थसंकल्पाच्या तारखात बदल केला आहे. अर्थमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, निवडणुका असलेल्या राज्यांवर अर्थसंकल्पातून प्रभाव पाडण्याचा सरकारचा कुठलाही हेतू नाही. कायद्याचे कुठलेही उल्लंघन होत नसून अर्थसंकल्प स्थगित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्थसंकल्प उशिराने सादर करण्याबाबत निवडणूक आयोगही विचारणा करणार नाही, याचा सरकारला विश्वास आहे.